AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Murli Vijay: 2 वर्षानंतर मैदानात परतलेला मुरली विजय पुनरागमनाच्या सामन्यात सपशेल फेल

एकवेळ भारताच्या कसोटी संघाचा (Test Team) महत्त्वाचा भाग राहिलेला सलामीवीर मुरली विजयने (Murli Vijay) दोन वर्षानंतर मैदानावर पुनरागमन केलं.

Murli Vijay: 2 वर्षानंतर मैदानात परतलेला मुरली विजय पुनरागमनाच्या सामन्यात सपशेल फेल
murli vijayImage Credit source: instagram
| Updated on: Jun 25, 2022 | 12:13 PM
Share

मुंबई: एकवेळ भारताच्या कसोटी संघाचा (Test Team) महत्त्वाचा भाग राहिलेला सलामीवीर मुरली विजयने (Murli Vijay) दोन वर्षानंतर मैदानावर पुनरागमन केलं. त्याने तामिळनाडू प्रीमियर लीगमधून मैदानात पुनरागमन केलय. TNPL मध्ये शुक्रवारी डिंडिगुल ड्रॅगर्स आणि रुबी त्रिची वॉरियर्स मध्ये सामना झाला. या लीगमध्ये मुरली विजय रुबी त्रिची वॉरियर्ससाठी खेळतोय. विजयकडून पहिल्या सामन्यात अपेक्षित कामगिरी झाली नाही. तो फ्लॉप ठरला. व्यक्तीगत कारणांमुळे मुरली विजयने क्रिकेटपासून ब्रेक घेतला होता. पुनरागमनाच्या सामन्यात त्याने खूप कमी धावा केल्या. तो फक्त 8 धावा करुन आऊट झाला. तो एकही चौकार मारु शकला नाही. दोन वर्षानंतर मुरली विजयच पुनरागमन दमदार होऊ शकलं नाही. या लीग मध्ये पुढच्या सामन्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी होईल, अशी अपेक्षा आहे.

विजय शेवटचा सामना कधी खेळला होता?

मुरली विजयने या सामन्याआधी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल 2020 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्यावेळी तो महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. त्या सीजनमध्ये तो तीन आय़पीएल सामने खेळला होता. विजय बऱ्याचकाळापासून टीम इंडियात स्थान मिळवू शकलेला नाही. तो भारतासाठी पर्थ येथे 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

मुरली विजयचा संघ जिंकला

विजय फलंदाजीमध्ये अपयशी ठरला असेल, पण त्याचा त्रिची वॉरियर्स संघ जिंकला. निद्धिश राजगोपालने या टीमसाठी अर्धशतक फटकावलं. त्यामुळे संघाला विजय मिळवता आला. त्याशिवाय आदित्य गणेशने 37 धावा केल्या. 145 धावांचा पाठलाग करणाऱ्या त्रिची वॉरियर्सने अमित सात्विकचा विकेट लवकर गमावला होता. त्याने 15 चेंडूत 28 धावा केल्या. आपल्या डावात त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला. त्यानंतर विजय आऊट झाला. हे दोघे बाद झाल्यानंतर त्रिची वॉरियर्स संघाला झटका लागला नाही. राजगोपाल आणि गणेशने तिसऱ्याविकेसाठी 114 धावांची भागीदारी केली. राजगोपालने 48 चेंडूंचा सामना करताना, सहा चौकार आणि एक षटकार लगावला. त्याने नाबाद 64 धावा केल्या.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.