AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Murli Vijay: 2 वर्षानंतर मैदानात परतलेला मुरली विजय पुनरागमनाच्या सामन्यात सपशेल फेल

एकवेळ भारताच्या कसोटी संघाचा (Test Team) महत्त्वाचा भाग राहिलेला सलामीवीर मुरली विजयने (Murli Vijay) दोन वर्षानंतर मैदानावर पुनरागमन केलं.

Murli Vijay: 2 वर्षानंतर मैदानात परतलेला मुरली विजय पुनरागमनाच्या सामन्यात सपशेल फेल
murli vijayImage Credit source: instagram
| Updated on: Jun 25, 2022 | 12:13 PM
Share

मुंबई: एकवेळ भारताच्या कसोटी संघाचा (Test Team) महत्त्वाचा भाग राहिलेला सलामीवीर मुरली विजयने (Murli Vijay) दोन वर्षानंतर मैदानावर पुनरागमन केलं. त्याने तामिळनाडू प्रीमियर लीगमधून मैदानात पुनरागमन केलय. TNPL मध्ये शुक्रवारी डिंडिगुल ड्रॅगर्स आणि रुबी त्रिची वॉरियर्स मध्ये सामना झाला. या लीगमध्ये मुरली विजय रुबी त्रिची वॉरियर्ससाठी खेळतोय. विजयकडून पहिल्या सामन्यात अपेक्षित कामगिरी झाली नाही. तो फ्लॉप ठरला. व्यक्तीगत कारणांमुळे मुरली विजयने क्रिकेटपासून ब्रेक घेतला होता. पुनरागमनाच्या सामन्यात त्याने खूप कमी धावा केल्या. तो फक्त 8 धावा करुन आऊट झाला. तो एकही चौकार मारु शकला नाही. दोन वर्षानंतर मुरली विजयच पुनरागमन दमदार होऊ शकलं नाही. या लीग मध्ये पुढच्या सामन्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी होईल, अशी अपेक्षा आहे.

विजय शेवटचा सामना कधी खेळला होता?

मुरली विजयने या सामन्याआधी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल 2020 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्यावेळी तो महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. त्या सीजनमध्ये तो तीन आय़पीएल सामने खेळला होता. विजय बऱ्याचकाळापासून टीम इंडियात स्थान मिळवू शकलेला नाही. तो भारतासाठी पर्थ येथे 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

मुरली विजयचा संघ जिंकला

विजय फलंदाजीमध्ये अपयशी ठरला असेल, पण त्याचा त्रिची वॉरियर्स संघ जिंकला. निद्धिश राजगोपालने या टीमसाठी अर्धशतक फटकावलं. त्यामुळे संघाला विजय मिळवता आला. त्याशिवाय आदित्य गणेशने 37 धावा केल्या. 145 धावांचा पाठलाग करणाऱ्या त्रिची वॉरियर्सने अमित सात्विकचा विकेट लवकर गमावला होता. त्याने 15 चेंडूत 28 धावा केल्या. आपल्या डावात त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला. त्यानंतर विजय आऊट झाला. हे दोघे बाद झाल्यानंतर त्रिची वॉरियर्स संघाला झटका लागला नाही. राजगोपाल आणि गणेशने तिसऱ्याविकेसाठी 114 धावांची भागीदारी केली. राजगोपालने 48 चेंडूंचा सामना करताना, सहा चौकार आणि एक षटकार लगावला. त्याने नाबाद 64 धावा केल्या.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.