AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडिया तिसरी कसोटी दहा खेळाडूंवरच खेळणार, कारण ‘हा’ नियम

IND vs ENG R.Ashwin | भारताचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा दुसऱ्या दिवसानंतर सामन्यातून बाहेर पडला आहे. रविचंद्रन अश्विन याने शुक्रवारी 500 गडी बाद करण्याचा टप्पा गाठला होता. यामुळे भारतीय संघ दहा खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे.

टीम इंडिया तिसरी कसोटी दहा खेळाडूंवरच खेळणार, कारण 'हा' नियम
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 17, 2024 | 8:51 AM
Share

राजकोट, दि. 17 फेब्रुवारी 2024 | भारत आणि इंग्लंडमध्ये राजकोटमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात टि्वस्ट निर्माण झाला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघासमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. सामन्याचे उर्वरित दिवस भारतीय संघाला अकरा ऐवजी दहा खेळाडूंसह खेळावे लागणार आहे. भारताचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा दुसऱ्या दिवसानंतर सामन्यातून बाहेर पडला आहे. रविचंद्रन अश्विन याने शुक्रवारी 500 गडी बाद करण्याचा टप्पा गाठला होता. त्यानंतर त्याला कौटुंबिक कारणामुळे सामना सोडावा लागत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही महिती दिली.

पाच ऐवजी चारच गोलंदाज

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व निर्माण केले होते. ज्या बेसबॉलची सातत्याने चर्चा होत होती, त्याचेच खऱ्या अर्थाने दर्शन शुक्रवारी राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी झाले. शनिवारी इंग्लंडचा संघ बेसबॉल शैलीने खेळत राहिल्यास भारतासमोर संकट निर्माण होणार आहे. कारण आता भारताकडे रविचंद्रन अश्विन नसणार आहे. यामुळे चार गोलंदाजांवर भारताला खेळावे लागणार आहे. तसेच तिसऱ्या दिवशी टीम इंडिया प्लेइंग इलेवनमधील 10 खेळाडूंसोबतच मैदानात उतरणार आहे. भारताला सब्सीट्यूट खेळाडू घेता येणार आहे. परंतु तो गोलंदाजी करु शकणार नाही.

यामुळे बदली खेळाडू नसणार

रविचंद्रन अश्विनचे संघात नसल्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय संघ केवळ चार गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. फिरकी आक्रमणाची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यावर आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज वेगवान आक्रमणाची धुरा सांभाळतील. भारताला फक्त मैदानावर फिल्डिंगसाठी बदली खेळाडू मिळेल. अश्विन याने कौटुंबिक कारणांमुळे मैदान सोडले आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे त्याच्या जागी बदली खेळाडू टीम इंडियाला मिळणार नाही.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. त्यात रोहित शर्मा (131) आणि रवींद्र जडेजा (112) यांच्या खेळीमुळे 445 धावा केल्या. त्याला उत्तर देताना इंग्लंडने जोरदार सुरुवात केली. इंग्लंडने 35 षटकात 2 गडी गमावून 207 धावा केल्या. ओपनर डकेट याने धुवांधार फलंदाजी करत 118 चेंडूत नाबाद 133 धावा केल्या. रूट 12 धावांवर खेळत आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...