AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडिया तिसरी कसोटी दहा खेळाडूंवरच खेळणार, कारण ‘हा’ नियम

IND vs ENG R.Ashwin | भारताचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा दुसऱ्या दिवसानंतर सामन्यातून बाहेर पडला आहे. रविचंद्रन अश्विन याने शुक्रवारी 500 गडी बाद करण्याचा टप्पा गाठला होता. यामुळे भारतीय संघ दहा खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे.

टीम इंडिया तिसरी कसोटी दहा खेळाडूंवरच खेळणार, कारण 'हा' नियम
| Updated on: Feb 17, 2024 | 8:51 AM
Share

राजकोट, दि. 17 फेब्रुवारी 2024 | भारत आणि इंग्लंडमध्ये राजकोटमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात टि्वस्ट निर्माण झाला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघासमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. सामन्याचे उर्वरित दिवस भारतीय संघाला अकरा ऐवजी दहा खेळाडूंसह खेळावे लागणार आहे. भारताचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा दुसऱ्या दिवसानंतर सामन्यातून बाहेर पडला आहे. रविचंद्रन अश्विन याने शुक्रवारी 500 गडी बाद करण्याचा टप्पा गाठला होता. त्यानंतर त्याला कौटुंबिक कारणामुळे सामना सोडावा लागत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही महिती दिली.

पाच ऐवजी चारच गोलंदाज

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व निर्माण केले होते. ज्या बेसबॉलची सातत्याने चर्चा होत होती, त्याचेच खऱ्या अर्थाने दर्शन शुक्रवारी राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी झाले. शनिवारी इंग्लंडचा संघ बेसबॉल शैलीने खेळत राहिल्यास भारतासमोर संकट निर्माण होणार आहे. कारण आता भारताकडे रविचंद्रन अश्विन नसणार आहे. यामुळे चार गोलंदाजांवर भारताला खेळावे लागणार आहे. तसेच तिसऱ्या दिवशी टीम इंडिया प्लेइंग इलेवनमधील 10 खेळाडूंसोबतच मैदानात उतरणार आहे. भारताला सब्सीट्यूट खेळाडू घेता येणार आहे. परंतु तो गोलंदाजी करु शकणार नाही.

यामुळे बदली खेळाडू नसणार

रविचंद्रन अश्विनचे संघात नसल्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय संघ केवळ चार गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. फिरकी आक्रमणाची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यावर आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज वेगवान आक्रमणाची धुरा सांभाळतील. भारताला फक्त मैदानावर फिल्डिंगसाठी बदली खेळाडू मिळेल. अश्विन याने कौटुंबिक कारणांमुळे मैदान सोडले आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे त्याच्या जागी बदली खेळाडू टीम इंडियाला मिळणार नाही.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. त्यात रोहित शर्मा (131) आणि रवींद्र जडेजा (112) यांच्या खेळीमुळे 445 धावा केल्या. त्याला उत्तर देताना इंग्लंडने जोरदार सुरुवात केली. इंग्लंडने 35 षटकात 2 गडी गमावून 207 धावा केल्या. ओपनर डकेट याने धुवांधार फलंदाजी करत 118 चेंडूत नाबाद 133 धावा केल्या. रूट 12 धावांवर खेळत आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.