AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

R.Ashwin | टीम इंडियाला झटका, अश्विन तिसऱ्या टेस्टमधून बाहेर, तडकाफडकी का परतला घरी ?

रविचंद्रन अश्विनला मॅच मध्यात सोडूनच घरी परतावे लागले आहे. म्हणजेच सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा अश्विनविनाच हा उर्वरित सामना खेळावा लागेल. भारतीय संघासाठी हा एक मोठा झटका मानला जात आहे.

R.Ashwin | टीम इंडियाला झटका, अश्विन तिसऱ्या टेस्टमधून बाहेर, तडकाफडकी का परतला घरी ?
| Updated on: Feb 17, 2024 | 7:54 AM
Share

R. Ashwin | भारत आणि इंग्लंडदरम्यान राजकोटमध्ये टेस्ट मॅच सुरू आहे. मात्र या मॅच दरम्यानच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जॅक क्राउलीला बाद करत आर अश्विनने 500 विकेट्सचा पल्ला गाठला. तब्बल 500 बळी टिपत इतिहास रचणारा रविचंद्रन अश्विन या मॅचमधून बाहेर पडला आहे. बीसीसाआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, कुटुंबातील मेडिकल इमर्जन्सीमळे अश्विन हा सामना सोडून तडकाफडकी घरी परतला आहे. त्यामुळेच शनिवारी जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरेल तेव्हा अश्विन खेलमार नाही. त्याऐवजी पर्यायी खेळाडू फिल्डींग करेल. BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केलेल्या ट्विटनुसार, अश्विनच्या आईची तब्येत खराब आहे. आणि त्यामुळेच तो ही मॅच अर्धवट सोडून चेन्नईला परतला आहे.

बीसीसीआयने जारी केलं निवेदन

यासंदर्भात बीसीसीआयने एक निवेदन जारी केलं आहे. ‘ कुटुंबातील मेडिकल इमर्जन्सीमुळे रविचंद्रन अश्विनला कसोटी संघातून तत्काळ बाहेर पडला आहे. या कठीण काळात बीसीसीआय ठामपणे अश्विनच्या पाठीशी उभी आहे. बोर्ड अश्विन आणि त्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करेल.’ ‘ आम्ही अश्विन आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि कठीण काळात त्यांच्यासोबत आहोत, ‘ असे बीसीसीआयने म्हटले आहे. ‘ बोर्ड आणि टीम इंडियाकडून अश्विन आणि त्याच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली जाईल. सर्व चाहते आणि माध्यमांनी त्यांच्या आखसगी जीवनाचा आणि गोपनीयतेचा आदर राखावा अशी टीम इंडियाची अपेक्षा आहे.’ असेही या निवेदनात नमूद करण्यात आले.

अश्विनने पार केला 500 विकेट्सचा पल्ला

भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे तिसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या डावात टीम इंडियाने 445 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने 2 गडी गमवून 207 धावा केल्या आहेत. अजूनही भारताकडे 238 धावांची आघाडी आहे. शुक्रवारी आर. अश्विनने एक गडी बाद करत 500 विकेट्सचा पल्ला गाठला. आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये जलद 500 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. 98 कसोटी सामन्यात आर अश्विनने ही किमया साधली आहे. मुरलीधरनने 500 विकेट्स 87 सामन्यात घेतले होते.

तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला यावेळी रविचंद्रन अश्विनची खूप गरज आहे. अश्विनने पाचशे विकेट्स पूर्ण केल्या, पण आता पुढले तीन दिवस तो टीम इंडियासोबत नसेल. भारतीय संघ आता कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 10 खेळाडू आणि एक बदली खेळाडू घेऊन मैदानात उतरणार आहे.

Follow Us
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...