AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy : वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पहिल्याच सामन्यात दमदार विजय, एक डाव आणि 165 धावांनी नमवलं

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बिहारने मोठा विजय मिळवला. अरूणाचल प्रदेशचा बिहारसमोर निभाव लागला नाही. हा सामना बिहारने एक डाव आणि 165 धावांनी जिंकला. पण या सामन्यात उपकर्णधार वैभव सूर्यवंशी काही खास करू शकला नाही.

Ranji Trophy : वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पहिल्याच सामन्यात दमदार विजय, एक डाव आणि 165 धावांनी नमवलं
Ranji Trophy : वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पहिल्याच सामन्यात दमदार विजय, एक डाव आणि 165 धावांनी नमवलंImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 17, 2025 | 6:18 PM
Share

रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बिहार आणि अरुणाचल प्रदेश हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा अरूणाचल प्रदेशच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. अरूणाचल प्रदेशने पहिल्या डावात 10 गडी गमवून 105 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्याच डावात बिहारने मोठी आघाडी घेतली. बिहारने 116.3 षटकात 9 गडी गमवून 542 धावांचा डोंगर रचला आणि डाव घोषित केला. पहिल्याच डावात बिहारकडे 437 धावांची आघाडी होती. या डावात उपकर्णधार वैभव सूर्यवंशीकडून फार अपेक्षा होत्या. मात्र फार काही खास करू शकला नाही. त्याने 5 चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार आणि 1 षटकार मारून 14 धावांवर बाद झाला.

बिहारकडून आयुष लोहोरुकाने एका बाजूने अरूणाचल प्रदेशाच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. त्याने 247 चेंडूंचा सामना करत 37 चौकार आणि 1 षटकार मारत 226 धावा केल्या. अमाव किशोरने 52, कर्णधार गनीने 59, बिपिन सौरभने 52 आणि सचिन कुमारने 75 धावांची खेली केली. त्यांच्या खेळीमुळे बिहारने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. अरुणाचल प्रदेशचा संघ 437 धावांची आघाडी मोडून काढतानाच संपला. दुसऱ्या डावात कशी बशी 272 धावांपर्यंत मजल मारली. पण आघाडी काही मोडता आली नाही. तेची नेरीने 128 धावांची खेळी केली. पण त्याला इतरांची काही साथ लाभली नाही. संपूर्ण 272 धावांवर तंबूत परतला. बिहारने या सामन्यात एक डाव आणि 160 धावांनी विजय मिळवला.

बिहारचा साकीब हुसेन हा अरुणाचल प्रदेशवर भारी पडला. त्याने पहिल्या डावात 11.3 षचटकात 41 धावा देत 6 गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावात 16 षटकात 58 धावा देत 4 गडी बाद केले. हिमांशु सिंहने दुसऱ्या डावात 3 गडी बाद केले. तर सचिन कुमारने 2 गडी तंबूत पाठवले. या सामन्यात उपकर्णधार वैभव सूर्यवंशीकडून क्रीडाप्रेमींना अपेक्षा होत्या. मात्र अपेक्षाभंग झाला. आता पुढच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

अरुणाचल प्रदेश (प्लेइंग इलेव्हन): नीलम ओबी (कर्णधार), जैनाथ मानसिंग, कमशा यांगफो (विकेटकीपर), तेची डोरिया, अभिनव सिंग, सिद्धार्थ बलोदी, तेची नेरी, लिमार दाबी, तडाकमल्ला मोहित, नबाम डोल, याब निया निया

बिहार (प्लेइंग इलेव्हन): साकिबुल गनी (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, बिपिन सौरभ (विकेटकीपर), अर्णव किशोर, आयुष लोहारुका, रघुवेंद्र प्रताप सिंग, आमोद यादव, सचिन कुमार, हिमांशू सिंग, नवाज खान, साकिब हुसेन

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.