AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर मी कोच असतो तर.. रवि शास्त्री यांचा अप्रत्यक्षरित्या गौतम गंभीरला टोला, रोहित शर्माबाबत केलं असं भाष्य

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाचं रुपडं पालटणार आहे. दोन अनुभवी खेळाडूंची उणीव इंग्लंड दौऱ्यात भासणार आहे. असं असताना रोहित शर्माच्या निवृत्तीवरून माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या माध्यमातून त्यांनी गौतम गंभीरवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

जर मी कोच असतो तर.. रवि शास्त्री यांचा अप्रत्यक्षरित्या गौतम गंभीरला टोला, रोहित शर्माबाबत केलं असं भाष्य
रवि शास्त्री आणि रोहित-गंभीरImage Credit source: PTI
| Updated on: May 16, 2025 | 7:25 PM
Share

भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यात कसोटी लागणार यात काही शंका नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती घेतल्याने खळबळ उडाली आहे. कारण बीसीसीआयपुढे नव्याने संघ बांधणीचं आव्हान आहे. कर्णधारापासून संपूर्ण संघ बांधण्यासाठी बीसीसीआयसाठी निवड समिती खलबतं करत आहे. दोन दिग्गज खेळाडूंची जागा भरून काढणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेवर परिणाम होणार आहे. सुरुवातीपासून विजयी टक्केवारी मजबूत ठेवायची असेल तर या मालिकेत कमाल करावी लागणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी रोहित शर्माबाबत भाष्य केलं आहे. या विधानातून त्यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधल्याचं बोललं जात आहे.

रोहित शर्माने 7 मे रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली होती. म्हणजेच रोहित शर्माचा शेवटचा कसोटी सामना मेलबर्नमद्ये झाला होता. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. सिडनीमध्ये खेळलेल्या कसोटीत रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. ब्रॉडकास्टरशी बोलताना रोहितने स्पष्ट केलं होतं की, तो स्वत:हून या सामन्यातून बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे. आता मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी त्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

रवि शास्त्री यांनी आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये खुलासा केला की, काही दिवसांपूर्वी मुंबईत रोहित शर्मासोबत चर्चा झाली होती. तेव्हा सिडनी कसोटीबाबत त्याच्याशी बोललो. असं सांगत रवि शास्त्री पुढे म्हणाले की, ‘कदाचित मी रोहित शर्माला सांगितलं होतं की, जर मी कोच असतो तर तो सामना खेळणार नाही असं झालं नसतं.तो शेवटचा कसोटी सामनाही खेळू शकला असता. कारण मालिका धोक्यात होती.’ रवि शास्त्री यांनी अप्रत्यक्षरित्या गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे.

‘लगेच हार पत्कारण्यापैकी मी नाही. जेव्हा मालिका 2-1 अशी होती तेव्हा संघाला सोडून जावं. तो सामना असा होता की त्यात 30-40 धावा खूप होत्या.’ असं रवि शास्त्री पुढे म्हणाले. सामन्यानंतर रोहितने स्पष्ट केलं होतं की या फॉर्मेटमध्ये खेळत राहणार आहे. फक्त एका सामन्यासाठी बाहेर बसलो होतो. पण पाच महिन्यातच त्याने निवृत्ती जाहीर केली.

Follow Us
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.