AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋषभचा तो व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल, अपघाताआधी एक दिवस त्याने प्रेमाने ‘या’ जीवांना घातले होते खाऊ…

'माय सिली पॉइंट ऑफ द डे.' त्यामुळेऋषभ पंतच्या या व्हिडिओवर अनेक यूजर्सच्या कमेंट येत आहेत. तो लवकर निरोगी आणि तंदुरुस्त व्हावा अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे.

ऋषभचा तो व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल, अपघाताआधी एक दिवस त्याने प्रेमाने 'या' जीवांना घातले होते खाऊ...
| Updated on: Dec 30, 2022 | 10:05 PM
Share

मुंबईः भारतीय क्रिकेट संघासह आज जगभरातील क्रिकेट शौकिंनांना भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या अपघाताची बातमी समजताच अनेकांना धक्का बसला होता. दिल्लीहून रुरकीला जात असताना पंतची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला धडकून शुक्रवारी सकाळी मोठा अपघात झाला होता. नरसन सीमेवरील हम्मादपूर झालजवळ हा भीषण दुर्घटना घडली होती. यावेळी अपघात होताच काही वेळातच त्यांच्या महागड्या कारला आगही लागली होती.

या दुर्घटनेनंतर पंतला रुग्णालयात दाखल केले असून त्याचा अपघात होण्यापूर्वी एक दिवसाआधीचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीला आपल्या घरी जात होता. त्यावेळी त्याच्या कारला गंभीर अपघात झाला. हा अपघात होण्यापूर्वीचा एक दिवसा आधीचा आणि त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तो पक्ष्यांना खाऊ टाकत आहे. तर या व्हिडीओला पंतने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माय सिली पॉइंट ऑफ द डे.’ त्यामुळेऋषभ पंतच्या या व्हिडिओवर अनेक यूजर्सच्या कमेंट येत आहेत. तो लवकर निरोगी आणि तंदुरुस्त व्हावा अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे.

अनेक जण आपल्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी मिळाल्यानंतर अनेकांना आपल्यासारखंही इतरांनी सुखी आणि आनंदी राहावं असं वाटतं. त्यामुळे अनेक जण पक्षानाही खायला देणे, त्यांची काळजी घेणे ही कामंही करतात.

ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार पक्ष्यांना खाऊ घालणाऱ्यांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते असं सांगितले जाते. जेव्हा एकाद्या व्यक्ती पक्ष्यांना खाऊ घालते तेव्हा तो त्या मुक्या प्राण्यांसाठी एक प्रकारचे देवाचेच तो कार्य करतो असं मानलं जातं.

जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील पक्ष्यांना धान्य खायला घालता तेव्हा तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होत असते. त्यामुळेच सुख, शांती आणि समृद्धी येते. याशिवाय घरामध्ये कबुतर खायला आल्यास तुम्हाला आर्थिक फायदाही होत असतो.

काही लोक स्वतःच्या घराच्या गच्चीवर कबुतरांसाठी अन्न ठेवतात. अशा परिस्थितीत नफ्याऐवजी तोटाही होऊ शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार राहू घराच्या छताशी संबंधित आहे आणि कबुतराला खायला घालणे हे बुध ग्रहासाठी एक उपाय आहे.

कुंडलीसोबतच जर बुध आणि राहूचा संयोग असेल तर व्यक्तीची मानसिक अवस्था चांगली नसते असंही सांगितले जाते. कबूतर छतावर बसतात तेव्हा ते पक्षी छतालाही घाण करत असतात. त्यामुळे छप्पर हेही दूषित होते.

Follow Us
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण.
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'.
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस...
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस....
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार.
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध.