India vs England, 1st Odi | पहिल्या सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीची मोठी घोषणा,रोहित-शिखर सलामीला येणार

23 मार्चपासून टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला (india vs england odi series) सुरुवात होत आहे. या मालिकेत टीम इंडियाकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) ही जोडी सलामी करेल, अशी माहिती कर्णधार विराट कोहलीने दिली.

India vs England, 1st Odi | पहिल्या सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीची मोठी घोषणा,रोहित-शिखर सलामीला येणार
23 मार्चपासून टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला (india vs england odi series) सुरुवात होत आहे. या मालिकेत टीम इंडियाकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) ही जोडी सलामी करेल, अशी माहिती कर्णधार विराट कोहलीने दिली.
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 6:23 PM

पुणे : टेस्ट आणि टी 20 सीरिजनंतर टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 23 मार्चपासून एकदिवसीय (India vs England Odi Series 2021) मालिकेला सुरुवात होत आहे. या वनडे सीरिजमध्ये 3 सामने खेळण्यात येणार आहेत. या सामन्यांचे आयोजन पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या मालिकेआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) मोठी घोषणा केली आहे. या मालिकेत सलामीला कोण खेळणार, याबाबतचा खुलासा विराटने केला आहे. (rohit sharma and shikhar dhawan will opening in india vs england odi series says virat kohli)

कोण खेळणार सलामीला?

‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि ‘गब्बर’ शिखर धवन (Shikhar Dhawan) ही जोडी या मालिकेत सलामी करणार आहेत. याबाबतची माहिती विराटने दिली. पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस विराट बोलत होता. विराटने यादरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

सूर्यकुमारला संधी मिळणार?

“मुंबईकर सूर्यकुमार यादवने टी 20 मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याला या कामिगरीच्या जोरावर एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं. सूर्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायची की नाही,याबाबत आम्ही ठरवू”, असं विराटने नमूद केलं.

धवनसमोर चांगल्या कामगिरीचे आव्हान

शिखर धवनला इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे शिखरला संघातून वगळण्यात आले. मात्र त्यानंतरही निवड समितीने शिखर धवनवर विश्वास दाखवला. शिखरची एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली. त्यामुळे शिखरसमोर या 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे.

कोण वरचढ, कोण कमजोर?

उभय संघात आतापर्यंत एकूण 100 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ आहे. भारताने इंग्लंडचा 53 सामन्यात धुव्वा उडवला आहे. तर इंग्लंडने टीम इंडियावर 42 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. 2 सामने बरोबरीत सुटले आहेत. तर 3 सामन्यांचा निकाल लागला नाही.

संबंधित बातम्या :

India vs England Odi Series 2021 | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, एकूण 100 वेळा आमनेसामने, कोण वरचढ, कोण कमजोर?

Virat Kohli | शतक एक फायदे अनेक, विराटला सेंच्युरी झळकावत अनेक रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

(rohit sharma and shikhar dhawan will opening in india vs england odi series says virat kohli)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.