AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माचा विसरभोळेपणा पुन्हा एकदा अधोरेखित, विजयी सोहळ्यात झालं असं की…

टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवल्यानंतर टीम इंडियाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. चाहत्यांचा उत्साह आणि प्रेम पाहून भारतीय खेळाडूही भारावून गेले. वर्ल्डकप जिंकल्यानंतर पाच दिवस उलटूनही चाहत्यांचा उत्साह पाहून खेळाडूंचं मन भरून आलं. विजयी सोहळ्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. पण या संबोधनातही त्याचा विसरभोळेपणा अधोरेखित झाला.

रोहित शर्माचा विसरभोळेपणा पुन्हा एकदा अधोरेखित, विजयी सोहळ्यात झालं असं की...
| Updated on: Jul 04, 2024 | 10:32 PM
Share

टीम इंडियाने टी20 वर्ल्डकपचं जेतेपद 17 वर्षांनंतर मिळवलं. तसेच आयसीसी चषकांचा दुष्काळ 11 वर्षानंतर संपवला. टीम इंडियाच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबईत तर खेळाडूंचं न भूतो न भविष्यती असं स्वागत करण्यात आलं. लाखोंचा जनुसमुदाय यावेळी टीम इंडियाच्या स्वागतासाठी जमा झाला होता. भारतीय खेळाडूंनाही चाहत्यांचा जोश पाहून आनंद झाला. या विजयाच्या सोहळ्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. रोहित शर्माने खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि चाहत्यांचे आभार मानले. यावेळी रोहित शर्माचा विसरभोळेपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. टी20 वर्ल्डकप जिंकून 14 वर्षांचा दुष्काळ संपवला असं रोहित शर्मा सहज म्हणून गेला. पण नंतर त्याला आपली चूक लक्षात आली आणि त्याने चूक दुरूस्त केली. आयसीसी चषकांचा 11 वर्षांचा दुष्काळ संपवला असं म्हणून त्याने तात्काळ आपल्या चुकीची दुरुस्ती केली.

रोहित शर्माने हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव याचंही कौतुक केलं. हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात घेतलेली विकेट खूपच महत्त्वाची होती असं तो म्हणाला. तर सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलचं कौतुक करण्यासही मागेपुढे पाहिलं नाही. रोहित शर्माने हार्दिक पांड्याचा उल्लेख केल्यानंतर चाहत्यांनीही दाद दिली. यावेळी त्यांनी हार्दिक हार्दिकचा जयघोष केला. हे सर्व ऐकून हार्दिक पांड्या भावूक झाल्याचं दिसून आलं. ही खूप खास टीम आहे आणि मी खूप नशिबवान आहे की या संघाचं नेतृत्व करत असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला. हा चषक संपूर्ण देशाचा आहे असंही रोहित शर्माने सांगितलं.

रोहित शर्माने यावेळी 2007 टी20 वर्ल्डकप आणि आताच्या वर्ल्डकपची तुलना होऊ शकत नाही असंही सांगितलं. दोन्ही विजय तितकेच महत्त्वाचे होते. 2011 वनडे वर्ल्डकप असो की, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आताचा टी20 वर्ल्डकप सर्वकाही स्पेशल आहे. दरम्यान, 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार आहे. ही स्पर्धा भारतासाठी महत्त्वाची आहे. कारण मागच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने भारताला अंतिम फेरीत पराभूत केलं होतं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 वर्ल्डकप क्रिकेटला रामराम ठोकला आहे. मात्र दोघंही वनडे खेळणार आहे. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धा खूपच महत्त्वाची आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.