AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माचा विसरभोळेपणा पुन्हा एकदा अधोरेखित, विजयी सोहळ्यात झालं असं की…

टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवल्यानंतर टीम इंडियाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. चाहत्यांचा उत्साह आणि प्रेम पाहून भारतीय खेळाडूही भारावून गेले. वर्ल्डकप जिंकल्यानंतर पाच दिवस उलटूनही चाहत्यांचा उत्साह पाहून खेळाडूंचं मन भरून आलं. विजयी सोहळ्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. पण या संबोधनातही त्याचा विसरभोळेपणा अधोरेखित झाला.

रोहित शर्माचा विसरभोळेपणा पुन्हा एकदा अधोरेखित, विजयी सोहळ्यात झालं असं की...
| Updated on: Jul 04, 2024 | 10:32 PM
Share

टीम इंडियाने टी20 वर्ल्डकपचं जेतेपद 17 वर्षांनंतर मिळवलं. तसेच आयसीसी चषकांचा दुष्काळ 11 वर्षानंतर संपवला. टीम इंडियाच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबईत तर खेळाडूंचं न भूतो न भविष्यती असं स्वागत करण्यात आलं. लाखोंचा जनुसमुदाय यावेळी टीम इंडियाच्या स्वागतासाठी जमा झाला होता. भारतीय खेळाडूंनाही चाहत्यांचा जोश पाहून आनंद झाला. या विजयाच्या सोहळ्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. रोहित शर्माने खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि चाहत्यांचे आभार मानले. यावेळी रोहित शर्माचा विसरभोळेपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. टी20 वर्ल्डकप जिंकून 14 वर्षांचा दुष्काळ संपवला असं रोहित शर्मा सहज म्हणून गेला. पण नंतर त्याला आपली चूक लक्षात आली आणि त्याने चूक दुरूस्त केली. आयसीसी चषकांचा 11 वर्षांचा दुष्काळ संपवला असं म्हणून त्याने तात्काळ आपल्या चुकीची दुरुस्ती केली.

रोहित शर्माने हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव याचंही कौतुक केलं. हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात घेतलेली विकेट खूपच महत्त्वाची होती असं तो म्हणाला. तर सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलचं कौतुक करण्यासही मागेपुढे पाहिलं नाही. रोहित शर्माने हार्दिक पांड्याचा उल्लेख केल्यानंतर चाहत्यांनीही दाद दिली. यावेळी त्यांनी हार्दिक हार्दिकचा जयघोष केला. हे सर्व ऐकून हार्दिक पांड्या भावूक झाल्याचं दिसून आलं. ही खूप खास टीम आहे आणि मी खूप नशिबवान आहे की या संघाचं नेतृत्व करत असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला. हा चषक संपूर्ण देशाचा आहे असंही रोहित शर्माने सांगितलं.

रोहित शर्माने यावेळी 2007 टी20 वर्ल्डकप आणि आताच्या वर्ल्डकपची तुलना होऊ शकत नाही असंही सांगितलं. दोन्ही विजय तितकेच महत्त्वाचे होते. 2011 वनडे वर्ल्डकप असो की, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आताचा टी20 वर्ल्डकप सर्वकाही स्पेशल आहे. दरम्यान, 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार आहे. ही स्पर्धा भारतासाठी महत्त्वाची आहे. कारण मागच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने भारताला अंतिम फेरीत पराभूत केलं होतं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 वर्ल्डकप क्रिकेटला रामराम ठोकला आहे. मात्र दोघंही वनडे खेळणार आहे. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धा खूपच महत्त्वाची आहे.

Follow Us
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो.
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली..
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली...
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी.....
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं.......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं........
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.