AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माचा विसरभोळेपणा पुन्हा एकदा अधोरेखित, विजयी सोहळ्यात झालं असं की…

टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवल्यानंतर टीम इंडियाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. चाहत्यांचा उत्साह आणि प्रेम पाहून भारतीय खेळाडूही भारावून गेले. वर्ल्डकप जिंकल्यानंतर पाच दिवस उलटूनही चाहत्यांचा उत्साह पाहून खेळाडूंचं मन भरून आलं. विजयी सोहळ्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. पण या संबोधनातही त्याचा विसरभोळेपणा अधोरेखित झाला.

रोहित शर्माचा विसरभोळेपणा पुन्हा एकदा अधोरेखित, विजयी सोहळ्यात झालं असं की...
| Updated on: Jul 04, 2024 | 10:32 PM
Share

टीम इंडियाने टी20 वर्ल्डकपचं जेतेपद 17 वर्षांनंतर मिळवलं. तसेच आयसीसी चषकांचा दुष्काळ 11 वर्षानंतर संपवला. टीम इंडियाच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबईत तर खेळाडूंचं न भूतो न भविष्यती असं स्वागत करण्यात आलं. लाखोंचा जनुसमुदाय यावेळी टीम इंडियाच्या स्वागतासाठी जमा झाला होता. भारतीय खेळाडूंनाही चाहत्यांचा जोश पाहून आनंद झाला. या विजयाच्या सोहळ्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. रोहित शर्माने खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि चाहत्यांचे आभार मानले. यावेळी रोहित शर्माचा विसरभोळेपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. टी20 वर्ल्डकप जिंकून 14 वर्षांचा दुष्काळ संपवला असं रोहित शर्मा सहज म्हणून गेला. पण नंतर त्याला आपली चूक लक्षात आली आणि त्याने चूक दुरूस्त केली. आयसीसी चषकांचा 11 वर्षांचा दुष्काळ संपवला असं म्हणून त्याने तात्काळ आपल्या चुकीची दुरुस्ती केली.

रोहित शर्माने हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव याचंही कौतुक केलं. हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात घेतलेली विकेट खूपच महत्त्वाची होती असं तो म्हणाला. तर सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलचं कौतुक करण्यासही मागेपुढे पाहिलं नाही. रोहित शर्माने हार्दिक पांड्याचा उल्लेख केल्यानंतर चाहत्यांनीही दाद दिली. यावेळी त्यांनी हार्दिक हार्दिकचा जयघोष केला. हे सर्व ऐकून हार्दिक पांड्या भावूक झाल्याचं दिसून आलं. ही खूप खास टीम आहे आणि मी खूप नशिबवान आहे की या संघाचं नेतृत्व करत असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला. हा चषक संपूर्ण देशाचा आहे असंही रोहित शर्माने सांगितलं.

रोहित शर्माने यावेळी 2007 टी20 वर्ल्डकप आणि आताच्या वर्ल्डकपची तुलना होऊ शकत नाही असंही सांगितलं. दोन्ही विजय तितकेच महत्त्वाचे होते. 2011 वनडे वर्ल्डकप असो की, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आताचा टी20 वर्ल्डकप सर्वकाही स्पेशल आहे. दरम्यान, 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार आहे. ही स्पर्धा भारतासाठी महत्त्वाची आहे. कारण मागच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने भारताला अंतिम फेरीत पराभूत केलं होतं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 वर्ल्डकप क्रिकेटला रामराम ठोकला आहे. मात्र दोघंही वनडे खेळणार आहे. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धा खूपच महत्त्वाची आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.