AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit sharma : कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, विराट कोहलीबाबत रोहित म्हणाला…

टीम इंडियाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मा एका मुलाखतीत विराटबद्दल म्हणाला, विराट कोहलीचं टीमधील योगदान अतिशय उत्तम आहे. त्याच्यासरख्या खेळाडुंची टीमला गरज आहे.

Rohit sharma : कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, विराट कोहलीबाबत रोहित म्हणाला...
भारतीय संघ
| Edited By: | Updated on: Dec 09, 2021 | 4:14 PM
Share

मुंबई : विराट कोहलीला टीम इंडियाचं कर्णधारपद गमवावे लागले आहे. आता टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या हाती देण्यात आली आहे. आयपीएलमधील रोहितची शानदार कामगिरी, तसेच व्हाईट बॉल क्रिकेटमधील जबरदस्त रेकॉर्ड, यामुळे कर्णधारपदी रोहितची निवड करण्यात आली आहे. आता टी-20 आणि वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे, तर केवळ टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली असणार आहे. त्यामुळे टीमला आता नवे नेतृत्व मिळाले आहे.

रोहित विराटबद्दल म्हणाला…

टीम इंडियाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मा एका मुलाखतीत विराटबद्दल म्हणाला, विराट कोहलीचं टीमधील योगदान अतिशय उत्तम आहे. त्याच्यासरख्या खेळाडुंची टीमला गरज आहे. विराट कोहलीने आतापर्यंत शानदार खेळी करत अनेकदा टीमला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे अशा खेळाडुंचा टीममधील भरणा टीमला आणखी मजबूत बनवतो.

विराट अजूनही टीमचा लीडर

विराट कोहलीबद्दल आणखी बोलताना रोहित म्हणाला, विराट कोहली अजूनही टीमचा लीडर आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाची परदेशातील कामगिरीही चांगली राहिली आहे. वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरी असणे अत्यंत कठिण आहे. ती किमया विराट कोहलीने करून दाखवली आहे.

विराटच्या नेतृत्वात एकही आयसीआयसी ट्रॉफी नाही

रोहित शर्माने त्याच्या पूर्व कॅप्टनचे तोंड भरून कौतुक केले असले तरी विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने एकही आयसीआयसी ट्रॉफी जिंकली नाही. त्यामुळेच विराट कोहलीचं कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. आयपीएलमध्ये पाच ट्रॉफी जिंकणार एकमेव कर्णधार रोहित शर्मा आहे. तसेच रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत प्रत्येक सिरीज जिंकली आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताला आगामी टी-20 विश्वचषक जिंकण्याचे वेध लागले आहे.

बेंचवर बसण्याच्या वादातून कॉलेजच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

Alcohol sales increased| जिल्ह्यातील थंडीचा पारा वाढताच; मद्याच्या विक्रीतही वाढ

किल्ले रायगडावर अस्थी विसर्जनाचा घाट? मराठा सेवक समितीनं काय केलाय आरोप?

Follow Us
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.