AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“2022 वर्ल्डकप पराभवासाठी रोहित-विराट जबाबदार, पण ते..”, संजय मांजरेकर यांचा थेट आरोप

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना आहे. या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे नाणेफेकीस उशीर झाला आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी 2022 वर्ल्डकपमधील पराभवाचं विश्लेषण केलं आहे. तसेच या पराभवासाठी रोहित-विराट जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.

2022 वर्ल्डकप पराभवासाठी रोहित-विराट जबाबदार, पण ते.., संजय मांजरेकर यांचा थेट आरोप
| Updated on: Jun 27, 2024 | 8:21 PM
Share

टीम इंडियाकडे टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. मागच्या पर्वात इंग्लंडने भारताची वाट अडवली होती. टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला होता. ही टीम इंडियाला झोपेतून जागं करणारी घडामोड होती असा टोला माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी मारला आहे. मागच्या पर्वात इंग्लंडने भारताला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात रोहित-विराटने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नव्हती असा आरोप संजय मांजरेकर यांनी केला आहे. त्यामुळेच टीम इंडियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं, असंही त्यांनी पुढे सांगितलं. या सामन्यात रोहित शर्माने 28 चेंडूत 27 धावा, तर विराट कोहलीने 40 चेंडूत 50 दावा केल्या होत्या. भारताने 20 षटकात 6 विकेट गमवून 168 धावा केल्या. या धावा इंग्लंडने 16 षटकात एकही विकेट न गमवता पूर्ण केल्या.

“भारताचा टी20 संघ पूर्णपणे बदलला आहे. 2022 वर्ल्डकपमधील पराभव हा वेक अप कॉल होता. पण ते काही मान्य करणार नाही. रोहित आणि विराट हे कधीच कबूल करणार नाहीत की त्यांचा पराभवात वाटा होता. पण नवी टीम इंडिया खूपच वेगळी आहे.”, असं संजय मांजरेकर यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना सांगितलं. “भारतासाठी जमेची बाजू म्हणजे इंग्लंड संघ मागच्या वेळेपेक्षा थोडा कमकुवत दिसत आहे. त्यामुळे पुढे जाण्यास भारताला मदत होईल.”, असंही संजय मांजरेकर पुढे म्हणाला.

संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीच्या फॉर्मबाबतही चिंता व्यक्त केली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात 66 धावा केल्या आहेत. 1,4,0,24,37 आणि 0 अशी धावसंख्या सहा सामन्यात अनुक्रमे आहे. “विराट कोहली हा चिंता वाटणारा विषय आहे. त्याच्याकडून हव्या तश्या धावा झाल्या नाहीत. पण जोखिम घेण्यात कुठेच मागे पडलेला नाही. तसेच बाद होण्याची चिंता नाही.उपांत्य फेरीतही त्याचा असाच मानस असेल यात शंका नाही. आता चौकार षटकाराची निवड करतो की सिंगलची हे पाहणं औत्सुक्याचं आहे. तेव्हाच त्याच्या फलंदाजीतील वेगळेपण दिसून येईल.”, असं संजय मांजरेकर यांनी सांगितलं.

Follow Us
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच....
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय.
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं.
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद..
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक...
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक....
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ.