AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“2022 वर्ल्डकप पराभवासाठी रोहित-विराट जबाबदार, पण ते..”, संजय मांजरेकर यांचा थेट आरोप

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना आहे. या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे नाणेफेकीस उशीर झाला आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी 2022 वर्ल्डकपमधील पराभवाचं विश्लेषण केलं आहे. तसेच या पराभवासाठी रोहित-विराट जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.

2022 वर्ल्डकप पराभवासाठी रोहित-विराट जबाबदार, पण ते.., संजय मांजरेकर यांचा थेट आरोप
| Updated on: Jun 27, 2024 | 8:21 PM
Share

टीम इंडियाकडे टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. मागच्या पर्वात इंग्लंडने भारताची वाट अडवली होती. टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला होता. ही टीम इंडियाला झोपेतून जागं करणारी घडामोड होती असा टोला माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी मारला आहे. मागच्या पर्वात इंग्लंडने भारताला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात रोहित-विराटने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नव्हती असा आरोप संजय मांजरेकर यांनी केला आहे. त्यामुळेच टीम इंडियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं, असंही त्यांनी पुढे सांगितलं. या सामन्यात रोहित शर्माने 28 चेंडूत 27 धावा, तर विराट कोहलीने 40 चेंडूत 50 दावा केल्या होत्या. भारताने 20 षटकात 6 विकेट गमवून 168 धावा केल्या. या धावा इंग्लंडने 16 षटकात एकही विकेट न गमवता पूर्ण केल्या.

“भारताचा टी20 संघ पूर्णपणे बदलला आहे. 2022 वर्ल्डकपमधील पराभव हा वेक अप कॉल होता. पण ते काही मान्य करणार नाही. रोहित आणि विराट हे कधीच कबूल करणार नाहीत की त्यांचा पराभवात वाटा होता. पण नवी टीम इंडिया खूपच वेगळी आहे.”, असं संजय मांजरेकर यांनी ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना सांगितलं. “भारतासाठी जमेची बाजू म्हणजे इंग्लंड संघ मागच्या वेळेपेक्षा थोडा कमकुवत दिसत आहे. त्यामुळे पुढे जाण्यास भारताला मदत होईल.”, असंही संजय मांजरेकर पुढे म्हणाला.

संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीच्या फॉर्मबाबतही चिंता व्यक्त केली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात 66 धावा केल्या आहेत. 1,4,0,24,37 आणि 0 अशी धावसंख्या सहा सामन्यात अनुक्रमे आहे. “विराट कोहली हा चिंता वाटणारा विषय आहे. त्याच्याकडून हव्या तश्या धावा झाल्या नाहीत. पण जोखिम घेण्यात कुठेच मागे पडलेला नाही. तसेच बाद होण्याची चिंता नाही.उपांत्य फेरीतही त्याचा असाच मानस असेल यात शंका नाही. आता चौकार षटकाराची निवड करतो की सिंगलची हे पाहणं औत्सुक्याचं आहे. तेव्हाच त्याच्या फलंदाजीतील वेगळेपण दिसून येईल.”, असं संजय मांजरेकर यांनी सांगितलं.

Follow Us
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?