AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND 2nd Odi | नक्की कुठे चुकलं? कॅप्टन केएल पराभवानंतर म्हणाला…

SA vs IND 2nd Odi Highlights | टीम इंडियाने केएल राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात झोकात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला त्याच पद्धतीने पराभूत व्हावं लागलं.

SA vs IND 2nd Odi | नक्की कुठे चुकलं? कॅप्टन केएल पराभवानंतर  म्हणाला...
| Updated on: Dec 20, 2023 | 12:24 AM
Share

ग्वेबेऱ्हा | क्रिकेट टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव झाला आहे. टीम इंडियाने पहिला सामना 8 विकेट्सने जिंकून दणक्यात सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मुसंडी मारत जोरदार कमबॅक केलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवत हिशोब बरोबर केला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाला 211 धावांवर ऑलआऊट केल्याने विजयासाठी 212 धावांच आव्हान मिळालं. हे आव्हान टोनो डी जॉर्जी याच्या नाबाद शतकाच्या जोरावर 43 व्या ओव्हरमध्यू पूर्ण केलं.

त्याआधी टीम इंडियाकडून सलामीवीर साई सुदर्शन आणि कॅप्टन केएल राहुल याने अर्धशतकी खेळी केली. सुदर्शनने 83 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 62 धावा केल्या. तर केएलने 64 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक 68 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेच्या नांद्रे बर्गर याने 3 विकेट्स घेतल्या. तर ब्यूरेन हेंड्रिक्स आणि केशव महाराज या दोघांना 2-2 विकेट्स मिळाल्या. टीम इंडियाचे फलंदाज आणि गोलंदाज या सामन्यात अपयशी ठरले. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी होती. ती संधी टीम इंडियाने गमावली. टीम इंडियाच्या पराभवानंतर केएल काय म्हणाला, हे जाणून घेऊयात.

केएल काय म्हणाला?

“सुरुवातीला थोडी मदत झाली. बॅटिंग करणं आव्हानात्मक होतं. पण आम्ही दोघे (केएल आणि साई सुदर्शन) सेट झालो. आम्ही पुढे गेलो असतो, तर 50-60 धावा आणखी जास्त झाल्या असत्या. त्यामुळे फरक पडला असता. आम्ही निर्णायक क्षणी विकेट गमावल्या”, असं केएल पराभवानंतर म्हणाला.

“पहिल्या दहा ओव्हरमध्ये आम्हाला मदत मिळाली. आम्ही चांगलं खेळलो. मात्र ते सातत्य (पहिल्या डावात) आम्हाला कायम ठेवता आलं नाही. सातत्य राहिलं असतं तर कदाचित परिस्थिती वेगळी असती.”, अशी खंत केएलने व्यक्त केली.”

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल(कॅप्टन आणि विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.

पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! राज ठाकरेंनी दिले आदेश
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! राज ठाकरेंनी दिले आदेश.
पार्थ पवारांना कोणतीही क्लिनचीट नाही! सूत्रांची माहिती
पार्थ पवारांना कोणतीही क्लिनचीट नाही! सूत्रांची माहिती.
नवी मुबंई महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला
नवी मुबंई महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला.
महापौरपदाच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंचे नगरसेवकांना व्हीप
महापौरपदाच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंचे नगरसेवकांना व्हीप.
गटारातील पाण्यात फळे धुतली; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
गटारातील पाण्यात फळे धुतली; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल.
मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर राज ठाकरेंकडून ट्विट करत टीका
मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर राज ठाकरेंकडून ट्विट करत टीका.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी! 2 तासांत 2 किलोमीटर अंतर पार
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी! 2 तासांत 2 किलोमीटर अंतर पार.
थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील! सदाभाऊ खोत यांचं मोठं विधान
थोड्या दिवसात जयंत पाटील भाजपात येतील! सदाभाऊ खोत यांचं मोठं विधान.