AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत इंग्लंड कसोटी मालिकेतून डावललं, पण संधी मिळाली आणि पुन्हा ठोकलं शतक

भारत इंग्लंड दौरा संपला असून आता आशिया कप स्पर्धेचे वेध लागले आहेत. दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा धडाका सुरु झाला आहे. असं असताना ज्या खेळाडूला इंग्लंड दौऱ्यासाठी डावललं. त्याने पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे.

भारत इंग्लंड कसोटी मालिकेतून डावललं, पण संधी मिळाली आणि पुन्हा ठोकलं शतक
भारत इंग्लंड कसोटी मालिकेतून डावललं, पण संधी मिळाली आणि पुन्हा ठोकलं शतकImage Credit source: PTI
| Updated on: Aug 18, 2025 | 4:13 PM
Share

भारताने इंग्लंड दौऱ्यात अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली आणि मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. या मालिकेत काही खेळाडूंनी पदार्पण केलं. पण त्यांची कामगिरी संमिश्र राहिली. दुसरीकडे, या संघात सर्फराज खानला काही संधी मिळाली नाही. पण जेव्हा कधी त्याला संघात संधी मिळाली तेव्हा त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. आता सरफराज खानने पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे. त्याने शतकी खेळी करत निवड समितीला विचार करण्यास भाग पाडलं आहे. आशिया कप स्पर्धेत तर स्थान मिळणं कठीण आहे. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दावा केला आहे. बुचीबाबू ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडू भविष्याची किल्ली शोधत आहेत. सरफराज खान मुंबईसाठी खेळत आहे. त्याने टीएनसीएविरुद्ध जबरदस्त फलंदाजी करत दावा ठोकला आहे. सरफराज खानने 92 चेंडूत शतक ठोकलं.

सरफराज खान फलंदाजीसाठी आला तेव्हा मुंबईने 98 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. मुंबईचा संघ अडचणीत आला होता. अशा स्थितीत सरफराज खानने खेळपट्टीवर तग धरला आणि चांगाली फलंदाजी केली. फिटनेसनंतर सरफराज खान पहिल्यांदा मैदानात उतरला होता. त्याने आपलं वजन कमी केलं असून फीटही दिसत आहे. दोन महिन्यात त्याने 17 किलो वजन कमी केलं. त्यामुळे त्याच्या इच्छाशक्तीचं कौतुक होत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यानेही त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचं कौतुक केलं होतं. पण मैदानात कधी उतरेल याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना होती. अखेर उतरला आणि त्याने शतक ठोकत करून दाखवलं.

ऑक्टोबर महिन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबरला होणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा सप्टेंबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे सरफराज खानला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्यातील काही खेळाडूंची नावं कमी होण्याची शक्यता आहे. त्यात ऋषभ पंत जखमी असल्याने या मालिकेत फीट झाला नाही तर त्याला संधी मिळू शकते. विकेटकीपर फलंदाज म्हणून त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा करूण नायर आणि साई सुदर्शन यांच्या जागी संघात स्थान मिळवू शकतो.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?