AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup:IND vs BAN महत्त्वाच्या मॅचआधी कॅप्टन शाकीब अल हसनच आपल्याच टीमबद्दल धक्कादायक वक्तव्य

T20 World Cup:भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या मॅचआधी बांग्लादेशच्या टीममध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आलीय?

T20 World Cup:IND vs BAN महत्त्वाच्या मॅचआधी कॅप्टन शाकीब अल हसनच आपल्याच टीमबद्दल धक्कादायक  वक्तव्य
shakib al hasanImage Credit source: PTI
| Updated on: Nov 01, 2022 | 2:29 PM
Share

ब्रिस्बेन: टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वच टीम आपल्याबाजूने जोरदार प्रयत्न करत आहेत. प्रत्येक टीम चॅम्पियन बनण्यासाठी मैदानावर घाम गाळतेय. दुसऱ्याबाजूला बांग्लादेशचा कॅप्टन शाकीब अल हसनने आपल्याच टीमबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आमची टीम टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलेली नाही, असं शाकीब म्हणाला. भारताविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या मॅचआधी शाकीबने हे चक्रावून टाकणार विधान केलं आहे. शाकीब अल हसन मीडियासमोर स्पष्टपणे बोलला, “टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आली आहे. आमची टीम वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलेली नाही”

….तर तो एक धक्कादायक निकाल असेल

“आम्ही इथे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलेलो नाही. भारत इथे जिंकण्यासाठी आला आहे. बांग्लादेशने भारताला हरवलं, तर तो एक धक्कादायक निकाल असेल” असं शाकीब अल हसन म्हणाला. बांग्लादेशी कॅप्टनच हे विधान खूपच धक्कादायक आहे. हा खेळाडू आपल्या टीमला टी 20 वर्ल्ड कप 2022 विजेतेपदाचा दावेदार मानत नाही.

पॉइंटस टेबलमध्ये बांग्लादेश कुठे?

बांग्लादेशची टीम सुपर-12 राऊंडमध्ये तीन पैकी दोन सामने जिंकली आहे. ग्रुप 2 मध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचा नेट रनरेट -1.533 आहे. दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशवर एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे नेट रनरेटमध्ये त्यांची ही स्थिती आहे. दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर बांग्लादेशने नेदरलँडस आणि झिम्बाब्वेवर विजय मिळवला.

भारताचं आव्हान बांग्लादेशसाठी सोपं नाही

भारतावर मात करणं बांग्लादेश टीमसाठी इतकं सोपं नाहीय. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा शेवटचा सामना गमावला. पण भारताची बॅटिंग युनिट फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमार यादवने सलग दोन सामन्यात दोन अर्धशतक ठोकली आहेत. सूर्यकुमार यादवपासूनच मुख्य धोका असल्याचं शाकीब अल हसनने मान्य केलं. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा बेस्ट टी 20 फलंदाज आहे, असं शाकीब अल हसन म्हणाला.

शाकीब फ्लॉप

टी 20 वर्ल्ड कपमध्ये शाकीबच प्रदर्शन खूपच खराब आहे. बांग्लादेशी कॅप्टनने 3 मॅचमध्ये 10.33 च्या सरासरीने 31 धावाच केल्या आहेत. शाकीबचा स्ट्राइक रेटही 100 पेक्षा कमी आहे. गोलंदाजीत त्याने 3 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनमी रेट प्रतिओव्हर 9 रन्सपेक्षा जास्त आहे.

मुंबईत आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक
मुंबईत आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक.
हम साथ साथ हैं! पार्थ-रोहित पवार यांची देहबोली काय सांगते?
हम साथ साथ हैं! पार्थ-रोहित पवार यांची देहबोली काय सांगते?.
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.