AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : दुसऱ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार मोठे बदल, या दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी पराभव झाल्यानंतर भारतीय संघात उलथापालथ होणार आहे. दुसऱ्या कसोटीसाठी संघात बदल केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्लेइंगल 11 मध्ये दोन बदल जवळपास निश्चित मानले जात आहेत.

IND vs ENG : दुसऱ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार मोठे बदल, या दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता
भारतीय कसोटी संघImage Credit source: BCCI
| Updated on: Jun 27, 2025 | 8:34 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना पूर्णपणे भारताच्या पारड्यात झुकलेला होता. चौथ्या दिवसापर्यंत तरी असंच चित्र होतं. कारण इंग्लंडला पाचव्या दिवशी विजयासाठी 350 धावांचं आव्हान हवं होतं. पण पाचव्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी झुजवलं आणि पाच विकेटने सामना जिंकला. खरं तर हा सामना गमवल्याने क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. इतक्या धावा करूनही सामना जिंकता येत नसेल तर मालिकेत खरंच खूप कठीण झालं आहे. या सामन्याच्या पराभवाचं संपूर्ण खापर हे गोलंदाजांवर फुटलं आहे. जसप्रीत बुमराह सोडला तर एकही गोलंदाज प्रभावी ठरला नाही. त्यामुळे दुसर्‍या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल केलं जाण्याची शक्यता आहे. संघात दोन बदल केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे जसप्रीत बुमराहला आराम दिला जाण्याची शक्यता आहे.

जसप्रीत बुमराहच्या जागी संघात अर्शदीप सिंग किंवा आकाशदीपला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर या सामन्यात शार्दुल ठाकुरला बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. कारण पहिल्या सामन्यात शार्दुल ठाकुर फलंदाजी आणि गोलंदाजीतही फेल गेला होता. त्याने संपूर्ण सामन्यात दोन षटकं टाकली आणि दोन विकेट घेतल्या. पण विकेट घेतल्या तेव्हा सामना हातून गेला होता. तर फलंदाजीतही काही खास करू शकला नाही. दोन्ही डावात एकेरी धावा करून तंबूत परतला. त्याच्या जागी संघात नितीश कुमार रेड्डी किंवा कुलदीप यादवला घेऊ शकते.

दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाने जोरदार सराव केला. सरावात कर्णधार शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी भरपूर घाम गाळला. तर बुमराह आणि प्रसिद्ध वगळता इतर गोलंदाजांनी गोलंदाजी केली. बर्मिंघमच्या एजबेस्टनची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांना मदत करणारी असते. तिसऱ्या दिवसापर्यंत बॅटिंगसाठी उत्तम मानलं जातं. तसेच वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळते. या सामन्यात शेवटच्या दिवशी जोरदार पावसाची शक्यता आहे. या मैदानात आतापर्यंत 60 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 19 वेळा, तर बॉलिंग करणाऱ्या संघाने 23 सामन्यात विजय मिळवला आहे.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!