AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN: पहिल्या वनडेतील धक्कादायक पराभवानंतर टीम मीटिंगमध्ये काय घडलं? शिखर धवनने सांगितलं सत्य

IND vs BAN: विजय सहज टप्प्यात असताना सुद्धा टीम इंडियाचा जिव्हारी लागणारा पराभव झाला....

IND vs BAN: पहिल्या वनडेतील धक्कादायक पराभवानंतर टीम मीटिंगमध्ये काय घडलं? शिखर धवनने सांगितलं सत्य
shikhar dhawan Image Credit source: PTI
| Updated on: Dec 06, 2022 | 5:54 PM
Share

ढाका: भारतीय टीमला बांग्लादेश विरुद्ध पहिल्या वनडे मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. कमी धावसंख्या बनवूनही टीम इंडियाने विजयाच्या दिशेने पावल टाकली होती. टीम इंडिया विजयापासून एक पाऊल दूर होती. पण मेहेदी हसन मिराजने मुस्ताफिजुर रहमानसोबत 10 व्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. या पार्ट्नरशिपने टीम इंडियाच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला. आता बुधवारी होणारा दुसरा वनडे सामना महत्त्वाचा आहे. ओपनर शिखर धवनने, दुसऱ्या वनडेआधी टीम मीटिंगमध्ये कुठल्या मुद्यांवर चर्चा झाली, त्याची माहिती दिली.

हेड कोचबद्दल म्हणाला…

शिखर धवनकडे वेगवेगळ्या कोचेसच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे, त्याबद्दलही धवनने आपलं मत मांडलं. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड आहेत. पण अलीकडेच न्यूझीलंड दौरा झाला. त्यावेळी एनसीएचे प्रमुख व्ही.व्ही.एस लक्ष्मण या दौऱ्यात हेड कोच होते.

दुसऱ्या वनडेमध्ये काय होणार?

टीम इंडियासाठी दुसरा वनडे सामना महत्त्वाचा आहे. कारण टीम इंडियाने हा सामना गमावला, तर ते सीरीज हरतील. त्यामुळे मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी टीम इंडियाला विजय आवश्यक आहे. टीम इंडियासाठी हा सामना ‘करो या मरो’ वाला आहे.

दुसऱ्या वनडेआधी धवन महत्त्वाची गोष्ट बोलला

“दुसरा वनडे सामना खेळण्याआधी आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे. सीरीजचा पहिला सामना गमावण्याची आमची ही पहिली वेळ नाही. पुनरागमन कसं करायच, ते आम्हाला माहित आहे. बांग्लादेशची टीम चांगलं क्रिकेट खेळली. मागचा सामना रोमांचक झाला. टोटल कमी होती. पण अखेरीस ते जिंकले. सहसा असं होत नाही. ते चांगलं क्रिकेट खेळले. याच श्रेय त्यांना जातं. टीम बैठकीत आम्ही या मुद्यावर चर्चा केली. आम्हाला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आम्ही आपल्या खेळाच विश्लेषण केलं” असं शिखर धवन म्हणाला.

फरक पडत नाही

धवनने अनेकदा भारतीय क्रिकेट टीमच नेतृत्व केलय. लक्ष्मण सोबतही काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. द्रविड यांच्या कोचिंगमध्ये सुद्धा खेळला आहे. धवनला वेगवेगळ्या कोचेसबद्दल प्रश्न विचारण्यात आला. प्रत्येक सीरीजमध्ये वेगवेगळ्या कोचेसची स्टाइल आत्मसात करण्यात अडचण येते का? त्यावर धवनने उत्तर दिलं की, “असं होतं नाही. मी वेगवेगळ्या कोचेसच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा मी आनंद घेतो. मी दोघांनी बऱ्याच काळापासून ओळखतोय. माझं दोघांबरोबरही चांगलं जमतं. हे कठीण नाहीय. मी गेल्या 10-12 वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. माझा मित्रत्वाचा व्यवहार असतो. मी कोणासोबतही सहज मिसळून जातो. मी प्रत्येक स्थितीमध्ये खूश आहे”

Follow Us
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...