AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN: पहिल्या वनडेतील धक्कादायक पराभवानंतर टीम मीटिंगमध्ये काय घडलं? शिखर धवनने सांगितलं सत्य

IND vs BAN: विजय सहज टप्प्यात असताना सुद्धा टीम इंडियाचा जिव्हारी लागणारा पराभव झाला....

IND vs BAN: पहिल्या वनडेतील धक्कादायक पराभवानंतर टीम मीटिंगमध्ये काय घडलं? शिखर धवनने सांगितलं सत्य
shikhar dhawan Image Credit source: PTI
| Updated on: Dec 06, 2022 | 5:54 PM
Share

ढाका: भारतीय टीमला बांग्लादेश विरुद्ध पहिल्या वनडे मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. कमी धावसंख्या बनवूनही टीम इंडियाने विजयाच्या दिशेने पावल टाकली होती. टीम इंडिया विजयापासून एक पाऊल दूर होती. पण मेहेदी हसन मिराजने मुस्ताफिजुर रहमानसोबत 10 व्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. या पार्ट्नरशिपने टीम इंडियाच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला. आता बुधवारी होणारा दुसरा वनडे सामना महत्त्वाचा आहे. ओपनर शिखर धवनने, दुसऱ्या वनडेआधी टीम मीटिंगमध्ये कुठल्या मुद्यांवर चर्चा झाली, त्याची माहिती दिली.

हेड कोचबद्दल म्हणाला…

शिखर धवनकडे वेगवेगळ्या कोचेसच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे, त्याबद्दलही धवनने आपलं मत मांडलं. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड आहेत. पण अलीकडेच न्यूझीलंड दौरा झाला. त्यावेळी एनसीएचे प्रमुख व्ही.व्ही.एस लक्ष्मण या दौऱ्यात हेड कोच होते.

दुसऱ्या वनडेमध्ये काय होणार?

टीम इंडियासाठी दुसरा वनडे सामना महत्त्वाचा आहे. कारण टीम इंडियाने हा सामना गमावला, तर ते सीरीज हरतील. त्यामुळे मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी टीम इंडियाला विजय आवश्यक आहे. टीम इंडियासाठी हा सामना ‘करो या मरो’ वाला आहे.

दुसऱ्या वनडेआधी धवन महत्त्वाची गोष्ट बोलला

“दुसरा वनडे सामना खेळण्याआधी आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे. सीरीजचा पहिला सामना गमावण्याची आमची ही पहिली वेळ नाही. पुनरागमन कसं करायच, ते आम्हाला माहित आहे. बांग्लादेशची टीम चांगलं क्रिकेट खेळली. मागचा सामना रोमांचक झाला. टोटल कमी होती. पण अखेरीस ते जिंकले. सहसा असं होत नाही. ते चांगलं क्रिकेट खेळले. याच श्रेय त्यांना जातं. टीम बैठकीत आम्ही या मुद्यावर चर्चा केली. आम्हाला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आम्ही आपल्या खेळाच विश्लेषण केलं” असं शिखर धवन म्हणाला.

फरक पडत नाही

धवनने अनेकदा भारतीय क्रिकेट टीमच नेतृत्व केलय. लक्ष्मण सोबतही काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. द्रविड यांच्या कोचिंगमध्ये सुद्धा खेळला आहे. धवनला वेगवेगळ्या कोचेसबद्दल प्रश्न विचारण्यात आला. प्रत्येक सीरीजमध्ये वेगवेगळ्या कोचेसची स्टाइल आत्मसात करण्यात अडचण येते का? त्यावर धवनने उत्तर दिलं की, “असं होतं नाही. मी वेगवेगळ्या कोचेसच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा मी आनंद घेतो. मी दोघांनी बऱ्याच काळापासून ओळखतोय. माझं दोघांबरोबरही चांगलं जमतं. हे कठीण नाहीय. मी गेल्या 10-12 वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. माझा मित्रत्वाचा व्यवहार असतो. मी कोणासोबतही सहज मिसळून जातो. मी प्रत्येक स्थितीमध्ये खूश आहे”

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....