AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team india : टीम इंडिया 9 वर्षांचा दुष्काळ लवकरच संपवणार, या दिग्गजाने केली मोठी भविष्यवाणी

गेल्या अनेक वर्षांपासून भारताला आयसीसी ट्रॉफीची अपेक्षा आहे. पुढील 9 वर्षात अनेक आयसीसी स्पर्धा आहेत, त्यात टीम इंडिया भारताला नक्की ट्रॉफी जिंकून देईल असा विश्वास सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे.

Team india : टीम इंडिया 9 वर्षांचा दुष्काळ लवकरच संपवणार, या दिग्गजाने केली मोठी भविष्यवाणी
सौरव गांगुली
| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 4:22 PM
Share

मुंबई : भारतीय टीम 9 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ लवकरच संपवेल अशी प्रतिक्रिया बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारताला आयसीसी ट्रॉफीची अपेक्षा आहे. पुढील 9 वर्षात अनेक आयसीसी स्पर्धा आहेत, त्यात टीम इंडिया भारताला नक्की ट्रॉफी जिंकून देईल असा विश्वास सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे.

2013 ला शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली

गेल्या काही वर्षात भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा वाढला आहे. भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली आहे, मात्र भारताने शेवटची आयसीसी ट्रॉपी 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रुपाने जिंकली होती. त्यानंतर भारताला कोणतेही मोठे इव्हेंटचे विजेतेपद मिळवता आले नाही. त्यामुळे आता भारताला 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या विजेतेपदाचे वेध लागले आहे. ट्रॉफी जिंकून देणारा लिडर अशी रोहित शर्माची ओळख आहे, आणि त्याच्याकडे टीमचे नेतृत्व आहे. त्यामुळे किमान त्याच्या नेतृत्वात तरी भारताचा हा दुष्काळ संपेल अशी अशा क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

द्रविड-रोहितच्या जोडगोळीवर गांगुलींना विश्वास

भारतीय टीममध्ये सध्या मोठे फेरबदल झाले आहेत. टी-20 आणि वनडेचा कर्णधार म्हणून रोहित शर्माला नियुक्त करण्यात आले आहे, टीमचा मुख्य कोच म्हणून राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडची कोच म्हणूनही कामिगीरीही चांगली राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आता टीमला नवी दिशा मिळेल, तसेच रोहित शर्माचा आधीचा अनुभव भारताला चांगले यश मिळवून देईल अशी अपेक्षा सौरव गांगुली आणि क्रिकेट चाहत्यांना आहे. या दोघांच्या नेतृत्वात टीम हा ट्रॉफीचा दुष्काळ कधी संपवते? हे येणारा काळच सांगेल.

Neem Face Masks: ग्लोइंग स्किनसाठी घरगुती कडुलिंबाचा फेस पॅक

उशिराचे शहाणपण : 30 लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप, उर्वरीत रक्कम कधीपर्यंत होणार जमा?

करीना कपूरसह अमृता अरोरा कोरोनाच्या विळख्यात, संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी होणार!

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.