AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team india : टीम इंडिया 9 वर्षांचा दुष्काळ लवकरच संपवणार, या दिग्गजाने केली मोठी भविष्यवाणी

गेल्या अनेक वर्षांपासून भारताला आयसीसी ट्रॉफीची अपेक्षा आहे. पुढील 9 वर्षात अनेक आयसीसी स्पर्धा आहेत, त्यात टीम इंडिया भारताला नक्की ट्रॉफी जिंकून देईल असा विश्वास सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे.

Team india : टीम इंडिया 9 वर्षांचा दुष्काळ लवकरच संपवणार, या दिग्गजाने केली मोठी भविष्यवाणी
सौरव गांगुली
| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 4:22 PM
Share

मुंबई : भारतीय टीम 9 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ लवकरच संपवेल अशी प्रतिक्रिया बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारताला आयसीसी ट्रॉफीची अपेक्षा आहे. पुढील 9 वर्षात अनेक आयसीसी स्पर्धा आहेत, त्यात टीम इंडिया भारताला नक्की ट्रॉफी जिंकून देईल असा विश्वास सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे.

2013 ला शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली

गेल्या काही वर्षात भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा वाढला आहे. भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली आहे, मात्र भारताने शेवटची आयसीसी ट्रॉपी 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रुपाने जिंकली होती. त्यानंतर भारताला कोणतेही मोठे इव्हेंटचे विजेतेपद मिळवता आले नाही. त्यामुळे आता भारताला 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या विजेतेपदाचे वेध लागले आहे. ट्रॉफी जिंकून देणारा लिडर अशी रोहित शर्माची ओळख आहे, आणि त्याच्याकडे टीमचे नेतृत्व आहे. त्यामुळे किमान त्याच्या नेतृत्वात तरी भारताचा हा दुष्काळ संपेल अशी अशा क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

द्रविड-रोहितच्या जोडगोळीवर गांगुलींना विश्वास

भारतीय टीममध्ये सध्या मोठे फेरबदल झाले आहेत. टी-20 आणि वनडेचा कर्णधार म्हणून रोहित शर्माला नियुक्त करण्यात आले आहे, टीमचा मुख्य कोच म्हणून राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडची कोच म्हणूनही कामिगीरीही चांगली राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आता टीमला नवी दिशा मिळेल, तसेच रोहित शर्माचा आधीचा अनुभव भारताला चांगले यश मिळवून देईल अशी अपेक्षा सौरव गांगुली आणि क्रिकेट चाहत्यांना आहे. या दोघांच्या नेतृत्वात टीम हा ट्रॉफीचा दुष्काळ कधी संपवते? हे येणारा काळच सांगेल.

Neem Face Masks: ग्लोइंग स्किनसाठी घरगुती कडुलिंबाचा फेस पॅक

उशिराचे शहाणपण : 30 लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप, उर्वरीत रक्कम कधीपर्यंत होणार जमा?

करीना कपूरसह अमृता अरोरा कोरोनाच्या विळख्यात, संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी होणार!

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....