AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरापासून संघातून बाहेर, आता आशिया कप 2025 स्पर्धेत मिळणार संधी? गांगुलीची मोठी मागणी

आशिया कप 2025 स्पर्धेची तयारी सुरु झाली आहे. बीसीसीआय निवड समिती सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात संघाची घोषणा करेल. असं असताना सौरव गांगुलीने एका वेगवान गोलंदाजासाठी बॅटिंग केली आहे. टीम इंडियासाठी सर्व फॉर्मेटमध्ये यशस्वी वेगवान गोलंदाज ठरू शकतो.

वर्षभरापासून संघातून बाहेर, आता आशिया कप 2025 स्पर्धेत मिळणार संधी? गांगुलीची मोठी मागणी
वर्षभरापासून संघातून बाहेर, आता आशिया कप 2025 स्पर्धेत मिळणार संधी? गांगुलीची मोठी मागणीImage Credit source: Pankaj Nangia/Getty Images
| Updated on: Aug 06, 2025 | 7:30 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ असून टी20 फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, भारताने वर्ल्ड चॅम्पियनशिप लीजेंड्स 2025 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. उपांत्य फेरीतही भारत खेळला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानला अंतिम फेरीचं तिकीट मिळालं होतं. असं सर्व चित्र असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप स्पर्धेसाठी कोणता संघ निवडला याची उत्सुकता आहे. शुबमन गिल या संघात असेल की नाही? श्रेयस अय्यरचं काय? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. असं असताना सौरव गांगुलीने या स्पर्धेपूर्वी मोठं वक्तव्य केलं आहे. सौरव गांगुलीचं वक्तव्य ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सौरव गांगुलीच्या मते एका खेळाडूच्या या स्पर्धेसाठी संघात समावेश केला पाहीजे. या खेळाडूने एक वर्षापूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. टीम इंडियासाठी 17 टी20 सामन्यात त्याने 24.35 च्या सरासरीने 20 विकेट घेतल्या आहेत.

सौरव गांगुली काय म्हणाला?

इंडिया टुडेशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, मुकेश कुमारची निवड आशिया कप स्पर्धेसाठी व्हायला हवी. तो एक चांगला वेगवान गोलंदाज आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने विकेट घेतल्या आहे. त्यामुळे त्याला संधी मिळायला हवी. सध्या टीम इंडिया कसोटी क्रिकेट खेळणार नाही. त्यामुळे त्याची निवड टी20 आशिया कपमध्ये व्हायला हवी. तो सर्व फॉर्मेटचा गोलंदाज आहे. त्याची वेळ नक्कीच येईल. फक्त त्याला धीर धरावा लागेल. मुकेश कुमारने 2023 मध्ये टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी खेळला होता. कसोटीत त्याने 25.57 च्या सरासरीने 7 विकेट घेतल्या होत्या. तर 6 एकदिवसीय सामन्यात त्याने 43.40 सरासरीने 5 गडी बाद केले होते.

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचं वेळापत्रक

टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना 10 सप्टेंबरला खेळणार आहे. हा सामना युएईविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर वेळापत्रकानुसार पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध 14 सप्टेंबरला सामना होईल. साखळी फेरीतील शेवटचा सामना ओमान विरुद्ध 19 सप्टेंबरला खेळला जाईल. 29 सप्टेंबरला अंतिम सामना दुबईत होणार आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.