AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022: दुबळ्या नामीबियाकडून श्रीलंकेची टीम कशी हरली? कोण आहे या पराभवाला जबाबदार?

T20 World Cup 2022: 'या' चूकांमुळे श्रीलंकेचा संघ हरला

T20 World Cup 2022: दुबळ्या नामीबियाकडून श्रीलंकेची टीम कशी हरली? कोण आहे या पराभवाला जबाबदार?
Srilanka teamImage Credit source: AFP
| Updated on: Oct 16, 2022 | 4:41 PM
Share

मुंबई: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) स्पर्धा सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी धक्कादायक निकाल पहायला मिळाला. रविवारी झालेल्या सामन्यात नामीबियाने श्रीलंकेवर (SL vs NAM) विजय मिळवला. मागच्याच महिन्यात श्रीलंकेने आशिया कपचे (Asia cup) विजेतेपद पटकावलं होतं. श्रीलंकेचा नामीबियाकडून पराभव होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नामीबियाने श्रीलंकेवर विजय मिळवला.

टप्पा आणि दिशा भरकटली

नामीबिया टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 163 धावा केल्या. श्रीलंकेची टीम या लक्ष्याचा पाठलाग करताना 108 धावांवर ऑलआऊट झाली. श्रीलंकेच्या गोलंदाजांना या मॅचमध्ये चांगली सुरुवात मिळाली होती. पण नंतर श्रीलंकन गोलंदाजांचा टप्पा आणि दिशा भरकटली. नामीबियाने चांगली धावसंख्या उभारली.

तीन गोलंदाजांची इकॉनमी जास्त

श्रीलंकेच्या तीन गोलंदाजांनी नऊ इकॉनमीपेक्षा जास्त धावा दिल्या. दुश्मंथा चामीराने 4 ओव्हरमध्ये 39 रन्स देऊन एक विकेट घेतला. प्रमोद मधुशन लियांगगमागेने चार ओव्हरमध्ये 9.75 च्या सरासरीने 37 धावा दिल्या.चामिका करुणारत्नेने चार ओव्हरमध्ये 36 धावा दिल्या व एक विकेट काढली. त्याची इकॉनमी नऊची होती.

टीमला गरज असताना दोघे आऊट

टीमची सलामीची जोडी पूर्णपणे फ्लॉप ठरली. पाथुम निसांका आणि कुसल मेंडीस यांनी चांगली सुरुवात केली नाही. निसांका 9 आणि मेंडीस 6 धावांवर आऊट झाला.

दानुष्का गुणाथिलका खातही उघडू शकला नाही. भानुका राजपक्षे आणि दासुन शनाकाने चांगली सुरुवात केली. पण मोठी इनिंग खेळू शकले नाहीत. भानुकाने 20 आणि दासुनने 29 धावा केल्या. टीमला गरज असताना दोघे आऊट झाले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.