AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: अंपायर्सच्या चुकीमुळे इंडिया-श्रीलंका पहिल्या वनडेत सुपर ओव्हर नाही!

ODI Super Over Rule: श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील सलामीचा सामना बरोबरीत सुटला होता. मात्र सुपर ओव्हर झाली नाही.

IND vs SL: अंपायर्सच्या चुकीमुळे इंडिया-श्रीलंका पहिल्या वनडेत सुपर ओव्हर नाही!
super over
| Updated on: Aug 15, 2024 | 3:55 PM
Share

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा काही दिवसांआधी पूर्ण झाला. टीम इंडियाने दौऱ्यातील टी 20 मालिका 3-0 फरकाने जिंकली. तर एकदिवसीय मालिकेत 2-0 ने गमवावी लागली. श्रीलंकेने दुसरा आणि तिसरा सामना सलग जिंकत मालिका खिशात घातली. श्रीलंकेला टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय द्विपक्षीय मालिका 27 वर्षांनी जिंकण्यात यश आलं. मात्र या मालिकेतील पहिला सामना हा बरोबरीत सुटला होता अर्थात टाय झाला होता. साधारणपणे सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरद्वारे विजयी संघ निश्चित केला जातो.मात्र या सामन्यात सुपर ओव्हर न झाल्याने क्रिकेट चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

ईसपीएन क्रिकेइंफोनुसार, सामनाधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली नाही. आयसीसीच्या खेळांच्या अटीनुसार, उभयसंघातील पहिल्या वनडेतील संबधित सामनाधिकाऱ्यांनी (मॅच रेफरी) सुपर ओव्हर न खेळवण्याची चूक केली. ईएसपीएन क्रिकइंफोला मिळालेल्या माहितीनुसार, या सामन्यात जोएल विल्सन आणि रवींद्र विमलसिरी हे फिल्ड अंपायर होते. पॉल रॉफेल टीव्ही तर रुचिरा पल्लियागुरुगे या फोर्थ अंपायर होत्या. तर रंजन मदुगले मॅच रेफरी होते. या पंचांनी आणि मॅच रेफरीने त्यांच्याकडू चूक झाल्याचं मान्य केलं आहे. आमच्याकडून एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या नियमांचं चुकीच्या पद्धतीने अर्थ काढला गेला. आयसीसीच्या नियमांनुसार, सामना बरोबरीत सुटल्यानंतर निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्याची तरतूद आहे.

उभयसंघातील सामना बरोबरीत सुटल्यानंतर पंचांनी स्टंपवरील बेल्स हटवल्या. त्यामुळे सुपर ओव्हर होणार नसल्याचं निश्चित झालं. मात्र दोन्ही संघाकडून कुणीही सुपर ओव्हरबाबत विचारणा केली नाही.खेळाडूंनी हस्तांदोलन केलं. मात्र त्यानंतर सुपर ओव्हर का झाली नाही? याबाबत सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली.

आयसीसीचे नियम काय सांगतात?

आयसीसीने डिसेंबर 2023 मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आणलेल्या नियमांनुसार, सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर होणार. तसेच सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यास तोवर सुपर ओव्हर होणार जोवर कोणती टीम विजयी होत नाही. तसेच विजेता संघ निश्चित करण्यासारखी परिस्थिती नसेल, अशा वेळेस सामना बरोबरीत राहिल. मात्र पंचांनी आणि सामनाधिकाऱ्यांनी सामना टाय झाल्यानंतर कोणतीच चर्चा केली नाही. मात्र त्यानंतर उर्वरित 2 पैकी 1 सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवण्याची तयारी या पंचांनी आणि सामन्याधिकाऱ्यांनी दर्शवली.

सामन्यात काय झालं?

श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाला विजयी धावा पूर्ण करण्यासाठी 18 बॉलमध्ये 5 धावांची गरज होती आणि हातात 2 विकेट्स होत्या. मात्र टीम इंडियाने 48 व्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावल्या आणि सामना बरोबरीत सुटला.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ