AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND | तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमारच्या त्या निर्णयामुळे क्रिकेट चाहते हैराण

South africa vs india 3rd t20i | टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियसाठी हा तिसरा सामना करो या मरो असा आहे. या सामन्यात कॅप्टन सूर्याने घेतलेल्या निर्णयाची चर्चा रंगली आहे.

SA vs IND | तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमारच्या त्या निर्णयामुळे क्रिकेट चाहते हैराण
| Updated on: Dec 14, 2023 | 8:43 PM
Share

जोहान्सबर्ग | दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20 सामन्यात टॉस जिंकला आहे. कर्णधार एडन मारक्रम याने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. दक्षिण आफ्रिका या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा तिसरा सामना करा या मरा असा आहे. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यासाठी टीममध्ये 3 बदल केले आहेत. मात्र टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने घेतलेल्या एका निर्णयामुळे भारतीय क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत. सूर्याचा निर्णय काही क्रिकेट चाहत्यांना पटलेला नाही.

नक्की काय झालं?

मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द झाला. दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयाचं खातं उघडलं. आता टीम इंडियाला मालिका गमावयाची नसेल तर हा सामना जिंकावा लागेल. मात्र सूर्याने या तिसऱ्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

दुसऱ्या टी 20 सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल ही सलामी जोडी शून्यावर आऊट झाली. त्यानंतर रिंकू सिंह आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव या जोडीने अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. मात्र पावसामुळे पहिला डाव पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला डीएलएसनुसार विजयासाठी 15 ओव्हरमध्ये 154 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 7 चेंडू राखून पूर्ण केलं.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात खोऱ्याने धावा लुटवल्या. गोलंदाजांना 154 धावांचा बचाव करण्यात अपयश आलं. विशेष म्हणजे कॅप्टन सूर्याने नंबर 1 बॉल रवी बिश्नोई याला प्लेईंग ईलेव्हनमधून बाहेर ठेवलं. होतं. त्यामळे तिसऱ्या सामन्यात रवी बिश्नोई याला संधी दिली जाईल, असा ठाम विश्वास क्रिकेट चाहत्यांना होता. मात्र कॅप्टन सूर्याने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास ठेवत टीममध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सूर्याच्या या निर्णयाबाबत विश्वास की धाडस अशी चर्चा रंगली आहे. आता सूर्याचा हा निर्णय चूक ठरतो की बरोबर हे थोड्याच वेळेत स्पष्ट होईल.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि नांद्रे बर्गर.

Follow Us
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.