AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या खेळाडूंवर सूर्यकुमारचा विश्वास, प्लेइंग 11 बाबत म्हणाला…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. हा निर्णय भारताच्या मनासारखा झाला. या सामन्यात भारताची प्लेइंग 11 निवडताना सूर्यकुमार यादवने अशी रणनिती आखली आहे.

Asia Cup : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या खेळाडूंवर सूर्यकुमारचा विश्वास, प्लेइंग 11 बाबत म्हणाला...
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या खेळाडूंवर सूर्यकुमारचा विश्वास, प्लेइंग 11 बाबत म्हणाला...Image Credit source: Michael Steele/Getty Images
| Updated on: Sep 14, 2025 | 7:45 PM
Share

आशिया कप स्पर्धेतील सर्वात चर्चेत असलेला भारत पाकिस्तान सामना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात होत आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान धावा देईल त्या गाठायचं आव्हान असणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या मनासारखा निर्णय झाला असंच म्हणावं लागेल. कारण नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर प्रथम गोलंदाजी केली असती त्याने सांगितलं. त्यामुळे हा निर्णय भारताच्या मनासारखा झाला आहे. या सामन्यात खेळाडूंवरही दडपण असणार आहे. खासकरून टीम इंडियाच्या खेळाडूंवर विजयाचं मोठं दडपण असेल. कारण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. त्यामुळे एकीकडे भारतीयांचा विरोध आणि दुसरीकडे विजयाचं दडपण असं दुहेरी दबाब खेळाडूंवर असेल. दरम्यान, या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने प्लेइंग 11 निवडताना काळजी घेतली आहे. कोणत्या 11 खेळाडूंवर विश्वास टाकला आहे याबाबत क्रीडाप्रेमींना उत्सुकता आहे. चला जाणून घेऊयात नाणेफेकीनंतर पाकिस्तानचा कर्णधाल सलमान आघा आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला आणि कसं काय असेल ते

सलमान आगा नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर म्हणाला की, प्रथम फलंदाजी करणार आहोत. आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत, खूप उत्साहित आहोत. खेळपट्टी संथ दिसतेय. फक्त प्रथम फलंदाजी करून धावा काढायच्या आहेत. त्याच संघासह खेळणार आहोत. गेल्या 20 दिवसांपासून इथे आहे आणि परिस्थितीची सवय झाली आहे.तर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो, त्यामुळे आम्ही समाधानी होतो. आम्ही फक्त एका स्ट्रिपच्या अंतरावर खेळलो, एक चांगली खेळपट्टी होती आणि रात्री फलंदाजीसाठी चांगली होती. दमट आहे म्हणून काही दव पडण्याची आशा आहे. तीच टीम घेऊन खेळणार आहोत.

दोन्ही संघांची प्लेइंग

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, सैम अयुब, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), फखर जमान, सलमान आघा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.