AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup: मोहम्मद शमीला संघात स्थान देण्याच्या मुद्यावर किरण मोरे म्हणतात….

आशिया कप (Asia Cup) स्पर्धेसाठी बीसीसीआयने काल रात्री संघाची घोषणा केली. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती सदस्य किरण मोरे (Kiran More) यांनी आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या संघावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

Asia Cup:  मोहम्मद शमीला संघात स्थान देण्याच्या मुद्यावर किरण मोरे म्हणतात....
kiran-shami
| Updated on: Aug 09, 2022 | 12:23 PM
Share

मुंबई: आशिया कप (Asia Cup) स्पर्धेसाठी बीसीसीआयने काल रात्री संघाची घोषणा केली. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती सदस्य किरण मोरे (Kiran More) यांनी आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या संघावर आपलं मत व्यक्त केलं आहे. आशिया कप टी 20 स्पर्धेसाठी जो संघ निवडण्यात आलाय, त्यापेक्षा टी 20 वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ वेगळा असेल, असं किरण मोरे यांना वाटतं. मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा भारताच्या टी 20 वर्ल्ड कप संघाचा निश्चित भाग असेल, असा दावा किरण मोरे यांनी केला आहे.

मोहम्मद शमीच्या निवडीवर किरण मोरे म्हणाले….

शमी भारताच्या वर्ल्ड कप टीमचा भाग असला पाहिजे. राहुल द्रविड यांना नेहमी बॅक अप सज्ज ठेवायला आवडतं. एखाद्या गोलंदाजाला दुखापत झाल्यास, आवेश खान सारखा गोलंदाज उपयुक्त ठरु शकतो, असं किरण मोरे म्हणाले. “जसप्रीत बुमराहची दुखापत किती गंभीर आहे, त्या बद्दल मला कल्पना नाही. पण वर्ल्ड कप टीम मध्ये मोहम्मद शमीची निवड झाली पाहिजे” असं मोरे म्हणाले.

संघात अनेक बदल

आशिया कपसाठीच्या संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. केएल राहुल आणि विराट कोहली यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेल, संजू सॅमसन यांना वगळण्यात आलं आहे. मोहम्मद शमीचा निवड समिती टी 20 साठी विचारच करत नाही. तो त्यांच्या योजनेचा भाग नाहीय. त्यामुळे शमीची अलीकडच्या टी 20 मालिकांसाठी संघात निवड करण्यात आली नव्हती. ,

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.