AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Warm up Match IND vs AUS: टीम इंडियाने हरणारी मॅच कशी जिंकली, जाणून घ्या विजयाची 5 कारण

Warm up Match IND vs AUS: फक्त शमीच्या चार विकेटच नाही, 'या' पाच कारणांमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर मिळवला विजय

Warm up Match IND vs AUS: टीम इंडियाने हरणारी मॅच कशी जिंकली, जाणून घ्या विजयाची 5 कारण
Team india
| Updated on: Oct 17, 2022 | 4:22 PM
Share

मुंबई: टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 World cup) पहिल्या वॉर्म अप मॅचमध्ये (Warm up Match) शानदार आणि रोमांचक विजय मिळवला. ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या (IND vs AUS) हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला. टीम इंडियाच्या शानदार फलंदाजीशिवाय डेथ ओव्हर्समधील बॉलिंगमुळे टीम इंडियाने ही मॅच जिंकली. एकवेळ ऑस्ट्रेलिया हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. पण भारताने डाव उलटवला.

टीम इंडियाने सामन्यात पुनरागमन कसं केलं? हरणारी मॅच कशी जिंकली? त्याबद्दल जाणून घेऊया. भारताने पहिली बॅटिंग केली. टीम इंडियाने 186 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची टीम 180 धावांवर ऑलआऊट झाली.

केएल राहुलची हाफ सेंच्युरी

केएल राहुलने आज मैदानात येताच आक्रमक फलंदाजी सुरु केली. त्यामुळेच भारताने पावरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 69 धावा केल्या. 6 ओव्हर्सनंतर रोहितने 9 चेंडूत केवळ 13 धावा केल्या होत्या. त्याचवेळी राहुलच्या 27 चेंडूत 50 धावा झाल्या होत्या.

सूर्यकुमारची इनिंग

केएल राहुल बाद झाल्यानंतर एकही फलंदाज खेळपट्टिवर टिकत नव्हता. त्यावेळी सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी केली. त्याने डाव सावरला. लास्ट ओव्हरमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं. त्याच्या फलंदाजीमुळे टीम 186 धावांपर्यंत पोहोचली. सूर्यकुमारने 33 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने सहा चौकार आणि एक षटकार लगावला.

हर्षल पटेलची 19 वी ओव्हर

शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 16 धावांची गरज होती. 19 वी ओव्हर हर्षल पटेलला देण्यात आली. त्याने या ओव्हरमध्ये एक विकेट घेऊन फक्त 5 रन्स दिल्या. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर फिंचला बोल्ड करुन हर्षलने टीम इंडियाला मोठ यश मिळवून दिलं. फिंचने 79 धावा केल्या. त्याच्या पुढच्या चेंडूवर इंग्लिस रनआऊट झाला.

शमीची निर्णायक ओव्हर

मोहम्मद शमीला लास्ट ओव्हर मिळाली. त्याला 11 रन्स डिफेंड करायचे होते. शमीच्या पहिल्या दोन चेंडूवर 4 धावा निघाल्या. त्यानंतर शमीच रौद्ररुप पहायला मिळालं. कमिन्सने त्याच्या गोलंदाजीवर कोहलीकडे झेल दिला. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर कार्तिक आणि शमीने मिळून एगरला रनआऊट केलं. ओव्हरच्या दोन चेंडूंवर शमीने अचूक यॉर्कर टाकले. पहिल्या बॉलवर जॉश इंग्लिस आणि त्यानंतर रिचर्डसन बोल्ड झाला.

कोहलीची फिल्डिंग

विराट कोहलीने या मॅचमध्ये बॅटने विशेष कमाल केली नाही. पण जबरदस्त फिल्डिंग त्याने केली. कोहलीने 19 व्या ओव्हरमध्ये जॉश इंग्लिसला शानदार डायरेक्ट थ्रो वर रनआऊट केलं. त्यानंतर कमिन्सची लाँग ऑनला बाऊंड्री लाइनवर शानदार कॅच घेतली. कमिन्सने षटकाराच्या उद्देशाने हा फटका मारला होता.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.