AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी आयसीसीचा खळबळजनक निर्णय, काय केलं वाचा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यंदाचं नववं पर्व आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होणार आहे. आयपीएल संपल्यानंतर पाच दिवसांनी या स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. या स्पर्धेत जेतेपदासाठी 20 संघांमध्ये चुरस असणार आहे. असताना आयसीसीच्या एका निर्णयाने धाकधूक वाढली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी आयसीसीचा खळबळजनक निर्णय, काय केलं वाचा
| Updated on: May 14, 2024 | 9:46 PM
Share

आयपीएल स्पर्धेसाठीचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या स्पर्धेसाठी 20 संघ सज्ज झाले असून 15 खेळाडूंच्या नावांची घोषणाही झाली आहे. 1 जूनपासून या स्पर्धेला अमेरिकेत सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. याच दिवशी दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. पाच संघांचे चार गट तयार केले असून यातील टॉप दोन संघ सुपर 8 फेरीत खेळतील. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर उपांत्य फेरीचा सामना 26 जून आणि 27 जूनला होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना 29 जूनला होणार आहे. असं सर्व वेळापत्रक सर्वश्रूत असताना आयसीसीच्या एका निर्णयाने खळबळ उडाली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, टी20 वर्ल्डकपसाठीच्या दुसऱ्या सेमीफायनलचा सामना चार तासांऐवजी 8 तासांचा असेल.

दुसऱ्या सेमीफायनलची वेळ चार तासांनी वाढवण्यात आली आहे. म्हणजेच दुसऱ्या सेमीफायनलसाठी दिवस राखीव नाही. याचा अर्थ असा की ज्या दिवशी हा सामना आहे त्याच दिवशी पूर्ण केला जाईल. कारण दुसरा उपांत्य फेरीचा सामना संपल्यानंतर लगेचच 29 जूनला अंतिम सामना होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीचा सामना 26 जूनला त्रिनिदाद येथे खेळवला जाईल. या सामन्यात पाऊस पडला तर एक दिवस राखीव आहे. म्हणजेच पावसाचं विघ्न पडलं तर हा सामना 27 जूनला होईल.

दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना 27 जूनला गयाना येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. म्हणजेच हा सामना त्याच दिवशी संपवण्याची योजना आहे. त्यासाठई आयसीसीने सामन्याची वेळ चार तासांनी वाढवली आहे. म्हणजे पावसाचं विघ्न आलं तर आणखी 4 चार तासांचा अवधी दिला जाईल. यासाठी राखीव दिवसाची गरज नसल्याचं आयसीसीचं म्हणणं आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (वीसी), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.