T20 World Cup: बाऊन्स असलेल्या विकेटवर तीन स्पिनर्सची गरज आहे? टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली आहे. आज संध्याकाळी 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला.

T20 World Cup: बाऊन्स असलेल्या विकेटवर तीन स्पिनर्सची गरज आहे? टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह
IND vs AUS 1st T20I: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात या खेळाडूंना संधी Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 6:48 PM

मुंबई: ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली आहे. आज संध्याकाळी 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. ही संघ निवड बॅलन्स वाटतेय. 2019 च्या वर्ल्ड कप टीममध्ये विजय शंकरची निवड वादग्रस्त ठरली होती. तसा आता कुठलाही वाद नाहीय. पण तरीही क्रिकेट पंडितांच्या मनात काही प्रश्न आहेत.

वेगवान गोलंदाजांना जास्त साथ देतात

ऑस्ट्रेलियात बाऊन्सी म्हणजे उसळी घेणाऱ्या खेळपट्टया आहेत. या विकेट्स वेगवान गोलंदाजांना जास्त साथ देतात. अशावेळी तीन स्पिनर्सची निवड अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. अक्षर पटेल, आर. अश्विन आणि युजवेंद्र चहल असे तीन फिरकी गोलंदाज या टीममध्ये आहेत.

रवींद्र जाडेजाला पर्याय म्हणून या खेळाडूची निवड

रवींद्र जाडेजा फिट असता, तर अक्षर पटेलची निवड झाली नसती. पण आशिया कप स्पर्धेत जाडेजाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेला जाडेजा मुकणार आहे. त्यामुळे त्याच्याजागी अक्षर पटेलची संघात निवड करण्यात आली आहे.

वेस्ट इंडिजमध्ये त्याने बॅटिंगची ताकत दाखवली

जाडेजाकडे ऑलराऊंडर म्हणून पाहिल जातं. अक्षर पटेलही तशीच कामगिरी करु शकतो. वेस्ट इंडिजमध्ये अक्षरने आपल्या बॅटिंगची ताकत दाखवून दिली होती. अक्षरकडे जाडेजाचा पर्याय म्हणून पाहिलं जातय. पण अक्षर पटेलला अजून बरच काही सिद्ध करायचं आहे. नुकतीच आशिया कप स्पर्धा संपली. या टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाकडे विजेतेपदाच दावेदार म्हणून पाहिलं जात होतं. पण टीमने सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळे वर्ल्ड कपच्या टीम निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं, स्वाभाविक आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.