AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022: वीजा समस्येमुळे टीम इंडियाचे 2 खेळाडू अडकून पडले भारतात

टीम इंडियाचे 2 खेळाडू अजूनही ऑस्ट्रेलियात पोहोचलेले नाहीत.

T20 World Cup 2022: वीजा समस्येमुळे टीम इंडियाचे 2 खेळाडू अडकून पडले भारतात
team indiaImage Credit source: twitter
| Updated on: Oct 12, 2022 | 7:26 PM
Share

मुंबई: टीम इंडिया (Team india) सध्या ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World cup) तयारीमध्ये व्यस्त आहे. 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने (IND vs PAK) टीम इंडिया आपल्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात करणार आहे. याआधी टीम इंडिया सध्या सराव सामने खेळून आपल्या तयारीचा अंदाज घेत आहे.

दोघांची नेट बॉलर म्हणून निवड

टीम इंडियाचे 2 खेळाडू अजूनही ऑस्ट्रेलियात पोहोचलेले नाहीत. वीजा कारणामुळे 2 गोलंदाजांना ऑस्ट्रेलियात पोहोचायला उशिर होतोय. उमरान मलिक आणि कुलदीप सेन या दोन बॉलर्सना टी 20 वर्ल्ड कपसाठी नेट बॉलर म्हणून निवडलं आहे.

उमरान आणि कुलदीप या दोघांचा वीज अजून आलेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला जाणारं विमान अजून त्यांना पकडता आलेलं नाही. उमरान सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीरकडून खेळतोय.

उमरानला दिली होती सवलत

उमरान मलिकला बीसीसीआयकडून जम्मू-काश्मीर टीमसाठी खेळण्याची परवानगी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाला तो कधी जाणार? याबद्दल अजून काहीही अपडेट नाहीय. उमरानच नाही, कुलदीपही अजून ऑस्ट्रेलियाला रवाना झालेला नाही. तो ही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशकडून राजस्थान विरुद्ध खेळतोय.

आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन

उमरान आयपीएलमधून चर्चेत आला होता. आयपीएमध्ये 157 किमीप्रतितास वेगान गोलंदाजी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार उमरान मलिक, मोहम्मद सिराज आणि कुलदीप सेन हे तिघे 6 ऑक्टोबरलाच टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होते.

रिझर्व्ह खेळाडूंसोबत रवाना होणार

मोहम्मद सिराजची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी निवड करण्यात आली होती. उमरान आणि कुलदीप वीजा कारणामुळे अजून जाऊ शकलेले नाहीत. आता दोघेही रिझर्व्ह खेळाडूंसोबत रवाना होतील, अशी शक्यता आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...
रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
NEET आंदोलनानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद; रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
ब्रेकिंग: हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले
Jalgaon | जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले; नद्यांना पूर
राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना...
Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे...
Sanjay Raut Press | दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर खोचक निशाणा
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...