Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्यापूर्वी वसीम अक्रमने सांगितली विजयाची ट्रिक

India vs Pakistan T20 World Cup Match : टी20 वर्ल्डकपमध्ये भारताचा एक सामना झाला आहे. त्या सामन्यात भारताने आयरलँडला आठ गडी राखून पराभव केला आहे. त्या सामन्यात रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी जोरदार कामगिरी केली. रोहितने अर्धशतक केले होते. परंतु विराट कोहली केवळ 1 धावा करुन बाद झाला होता.

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्यापूर्वी वसीम अक्रमने सांगितली विजयाची ट्रिक
IND vs PAK
Follow us
| Updated on: Jun 09, 2024 | 12:04 PM

IND vs PAK T20 World Cup 2024: टी20 विश्व कप 2024 मधील सर्वांचे लक्ष लागून असलेला सामना आज होत आहे. या सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार याने विजयाचे ट्रिक सांगितले आहे. अक्रम यांनी न्यूयॉर्कमधील खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी, कोणत्या ओव्हर महत्वाच्या असतील, यासंदर्भात माहिती दिली आहे. न्यूयॉर्कमधील स्टेडियमची खेळपट्टी स्लो आहे. यामुळे कसोटी सामन्याप्रमाणे फलंदाजी या ठिकाणी करावी लागणार आहे. तसेच शेवटची पाच षटके महत्वाची असणार आहे, असे वसीम अक्रम याने म्हटले आहे.

काय म्हणतो वसीम अक्रम

न्यूयॉर्कमधील खेळपट्टीवर 170 नाही तर 140 धावा झाल्या तरी खूप आहे. त्यासाठी कसोटी क्रिकेटप्रमाणे खेळावे लागणार आहे. यामुळे विकेट टिकून राहतील आणि शेवटच्या पाच षटकांत धावसंख्या 140 किंवा 150 पर्यंत नेता येणार आहे. प्रथम फलंदाजी करताना खेळपट्टीवर टिकून हळहळू धावफलक हलता ठेवणे गरजेचे आहे.

आतापर्यंत दोन्ही देशांत कशी राहिली परिस्थिती

भारत आणि पाकिस्तान दरम्यान आतापर्यंत 12 टी20 सामाने झाले आहेत. त्यामध्ये टीम इंडियाने 8 सामन्यात विजय मिळवला आहे. यापूर्वी दोन्ही संघात टी20 फॉर्मेटमधील शेवटचा सामना 2022 मधील टी20 विश्वकप स्पर्धेत झाला होता. त्या सामन्यात भारतने 4 विकेटने विजय मिळवला होता. त्यापूर्वी 2022 मध्ये सप्टेंबर महिन्यात दुबईत झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

हे सुद्धा वाचा

भारताचा पहिल्या सामन्यात विजय

टी20 वर्ल्डकपमध्ये भारताचा एक सामना झाला आहे. त्या सामन्यात भारताने आयरलँडला आठ गडी राखून पराभव केला आहे. त्या सामन्यात रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी जोरदार कामगिरी केली. रोहितने अर्धशतक केले होते. परंतु विराट कोहली केवळ 1 धावा करुन बाद झाला होता.

भारत आणि पाकिस्तान सामन्यात न्यूयॉर्क पावसाची शक्यता आहे. ज्या भागात सामना आहे, त्या नासाऊ काऊंटीमधील वातावरण बेभरवशाचे आहे. त्यामुळे पाऊस आल्यास क्रिकेट प्रेमींची निराशा होणार आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.