AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs NZ : पावसाकडून पाकिस्तानचा गेम, सेमी फायनलमधून पत्ता कट! न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ

NZ vs PAK Super 8 Match Result : आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 मधील पहिलाच सामना हा पावसाने यशस्वीरित्या जिंकला आहे. पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे सामन्याला सुरुवातच झाली नाही.

PAK vs NZ : पावसाकडून पाकिस्तानचा गेम, सेमी फायनलमधून पत्ता कट! न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ
New Zealand vs Pakistan Match Abandoned RainImage Credit source: @BLACKCAPS X Account
| Updated on: Feb 21, 2026 | 9:51 PM
Share

क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील पहिलाच सामना हा पावसामुळे नाईलाजाने रद्द करावा लागला आहे. सुपर 8 फेरीतील या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने होते. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला होता. मात्र पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे सामन्याला सुरुवातच झाली नाही. सामना थांबेल आणि खेळाला सुरुवात होईल अशी आशा चाहत्यांसह दोन्ही संघांच्या खेळाडूंनी होती. मात्र अखेर हा सामना पावसाने जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे.

पावसामुळे नाणेफेकीला विलंब

नियोजित वेळेनुसार कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये संध्याकाळी साडे सहा वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र पावसामुळे 6 वाजून 33 मिनिटांनी टॉस झाला. सलमान आघा याने न्यूझीलंडला फिल्डिंगसाठी भाग पाडलं. टॉसनंतरही पाऊस बसरत होता. मात्र पाऊस थांबेल आणि खेळ सुरु होईल, हीच आशा स्टेडियममधील चाहत्यांना होती. मात्र ही प्रतिक्षा लांबतच चाललेली.

पावसाने 1 तासा वाया घालवला. रात्रीचे 8 वाजले. त्यामुळे इथून ओव्हर कमी होणार असल्याचं निश्चित झालं. मात्र सामना सुरु होण्याची चिन्हं काही दिसत नव्हती. तसेच डीएलएसनुसार सामन्याचा निकाल लागण्यासाठी किमान 5 षटकांचा खेळ व्हावा लागतो. किमान 5 षटकांचा खेळ होण्यासाठी 10 वाजून 16 मिनिटं ही कट ऑफ वेळ होती. त्यामुळे या दरम्यान पाऊस थांबेल आणि खेळपट्टी कोरडी होऊन खेळाला सुरुवात होईल, या प्रतिक्षेत चाहते होते. मात्र तसं काही झालंच नाही. त्यामुळे अखेर आयसीसीने 140 मिनिटांचा खेळ वाया गेल्यानंतर 9 वाजून 20 मिनिटांनी सामना रद्द करत असल्याचं जाहीर केलं. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याबाबतची माहिती दिली.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ

दरम्यान सेमी फायनलसाठी सुपर 8 मधून 4 संघ पात्र ठरणार आहेत. सेमी फायनलच्या हिशोबाने सुपर 8 फेरीतील प्रत्येक सामना हा करो या मरो असा आहे. त्यात न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा पहिलाच सामना पावसाने वाया घालवला. त्यामुळे दोन्ही संघांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता या दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पोहचायचं असेल तर उर्वरित 2 सामने कोणत्या स्थितीत जिंकावे लागणार आहेत. तर दोन्ही संघांसाठी एकही पराभव स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. अशात आता न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघ सुपर 8 मोहिमेतील आपल्या पुढील दोन्ही सामन्यांत कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका.
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण.
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.