AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियातून बाहेर असलेल्या Prithvi Shaw याला सर्वात मोठा झटका, कारकीर्द संपली?

Prithvi Shaw : क्रिकेटर पृथ्वी शॉ याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पृथ्वी शॉ याला मोठा झटका लागला आहे. जाणून घ्या काय झालं?

टीम इंडियातून बाहेर असलेल्या Prithvi Shaw याला सर्वात मोठा झटका, कारकीर्द संपली?
Prithvi ShawImage Credit source: PTI
| Updated on: Dec 17, 2024 | 6:22 PM
Share

पृथ्वी शॉ, टीम इंडियापासून गेली अनेक वर्ष दूर असलेला मुंबईकर सलामीवीर फलंदाज. पृथ्वी शॉ याने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून दिली. पृथ्वीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक ठोकत आपली छाप सोडली. त्याला वनडे आणि टी 20i टीममध्ये संधी मिळाली. मात्र पृथ्वी गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियापासून दूर आहे. पृथ्वी गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटपेक्षा आरोग्य, बेशिस्तपणा, सरावाचा अभाव आणि वैयक्तिक आयुष्यातील वादामुळे चर्चेत राहिलाय. पृथ्वीचं टीम इंडियातील कमबॅक इतक्यात तरी शक्य वाटत नाही. अशात पृथ्वीला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका लागला आहे.

पृथ्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. मुंबईने रविवारी 15 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशचा पराभव करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जेतेपादावर आपलं नाव कोरलं. पृथ्वी या विजयी संघाचा सदस्य होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर आता विजय हजारे ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने या स्पर्धेतील पहिल्या 3 सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. पृथ्वीला या 17 सदस्यीय संघातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे पृथ्वीसाठी हा सर्वात मोठा झटका समजला जात आहे.

पृथ्वी शॉ याची Smat मधील कामगिरी

पृथ्वीला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या या हंगामातील सर्व 9 सामन्यांमध्ये संधी मिळाली. पृथ्वीने या 9 सामन्यांमध्ये एकूण 197 धावा केल्या. पृथ्वीला या हंगामात एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. पृथ्वीने विदर्भविरुद्धच्या उपांत्य पूर्व फेरीत 49 धावांची खेळी केली. पृथ्वी 9 पैकी 2 वेळा भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. त्याला एका डावात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर 6 डावांमध्ये त्याला चांगली सुरुवात मिळाली. मात्र मोठी खेळी करता आली नाही.

पृथ्वीच्या सामननिहाय धावा

विरुद्ध गोवा : 33 धावा

विरुद्ध महाराष्ट्र : 0

विरुद्ध केरळ : 23 धावा

विरुद्ध नागालँड : 40 धावा

विरुद्ध सर्व्हिसेस : 0

विरुद्ध आंध्रा : 34

विरुद्ध विदर्भ : 49

विरुद्ध बडोदा : 8

विरुद्ध मध्य प्रदेश : 10

विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई टीम : श्रेयस लियर (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष्ण रघुवंशी, जय बिस्ता, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), प्रसाद पवार (विकेटकीपर), अथर्व अंकोलेकर, तनुष कोटीयन, शार्दूल ठाकुर, रोयस्टन डायस, जुनेद खान , हर्ष तन्ना आणि विनायक भोईर.

Follow Us
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा.
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?.
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर.
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची.
भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही
भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही.
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच, मग आता...
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच, मग आता....
जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत.....
जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत......
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या.
अशोक खरात CDR प्रकरण पेटलं; सुषमा अंधारे–अंजली दमानिया आमनेसामने
अशोक खरात CDR प्रकरण पेटलं; सुषमा अंधारे–अंजली दमानिया आमनेसामने.
बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुक
बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुक.