AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियात सेमी फायनलआधी असा बदल, रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वीच स्पष्ट केलं की…

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध भारत सामना सुरु झाला आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्माला बेंचवर बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

टीम इंडियात सेमी फायनलआधी असा बदल, रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वीच स्पष्ट केलं की...
| Updated on: Mar 02, 2025 | 2:33 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या औपचारिक सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे जयपराजयाचा फरक पडणार नाही. पण कोणता संघ उपांत्य फेरीला समोर हे मात्र नक्की होणार आहे. भारताने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, जर गमावला तर दक्षिण अफ्रिकेशी लढत करावी लागणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. दरम्यान, या सामन्याआधीच टीम इंडियात बदल करण्यात आला आहे. कारण कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग 11 मध्ये बदल केला आहे. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात रोहित शर्माने त्याच प्लेइंग 11 वर विश्वास टाकला होता. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात एक बदल केला आहे.

कर्णधार रोहित शर्माने सांगितलं की, आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती, आम्ही दोन्ही सामन्यांमध्ये पाठलाग केल्यामुळे आम्ही सुरुवातीला काय करू शकतो आणि नंतर आमच्या गोलंदाजांना आव्हान देऊ शकतो हे पहायचे होते. मागील सामन्यांसारखेच दृष्टिकोन असेल, फक्त त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या संघात एक बदल आहे. हर्षितला विश्रांती देण्यात आली आहे, वरुण आमच्यासाठी खेळत आहे. हे सर्व भागीदारीत गोलंदाजी करण्याबद्दल आहे. दोन्ही सामन्यांमध्ये आम्ही एकत्रितपणे 19 बळी घेतले आहेत. आमच्या फिरकी गोलंदाजांनी त्यांना रोखले आहे आणि नंतर वेगवान गोलंदाजांनी बळी मिळवले आहेत.

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने सांगितलं की, ‘आम्हाला सुरुवातीला गोलंदाजी करायला आवडेल, चांगली खेळपट्टी दिसतेय. सुरुवातीला थोडा दबाव आणायचा आहे आणि आशा आहे की नंतर खेळपट्टी चांगली होईल. आम्हाला अजूनही जिंकायचे आहे, आम्हाला माहित आहे की आम्ही नंतर लाहोरमध्ये असणार आहोत.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड (प्लेइंग 11): विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.