AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीच्या सँडपेपर अ‍ॅक्शनचा टीम इंडियाला फटका? सुनील गावस्कर यांनी मांडलं गणित

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका गमवल्यानंतर टीम इंडियाचं पोस्टमॉर्टम सुरु आहे. काय चुकलं आणि काय केलं याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. सुनील गावस्कर यांनीही टीम इंडियाचे कान टोचले आहेत. खासकरून विराट कोहलीच्या सँडपेपर अ‍ॅक्शनवर नाराजी व्यक्त केली आहे.

विराट कोहलीच्या सँडपेपर अ‍ॅक्शनचा टीम इंडियाला फटका? सुनील गावस्कर यांनी मांडलं गणित
| Updated on: Jan 07, 2025 | 7:21 PM
Share

ऑस्ट्रेलियाने दहा वर्षानंतर बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका आपल्या नावावर केली आहे. भारताला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 ने पराभूत केलं. असं असताना या मालिकेत दोन्ही बाजूने खेळाडूंना डिवचण्याचा प्रकार घडला. विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने भारतीय क्रीडाप्रेमींना नाराज केलं. पण आपल्या आक्रमक शैलीने ऑस्ट्रेलियन चाहत्यांना उत्तर देण्यास मागेपुढे काहीच पाहिलं नाही. या मालिकेत यामुळे विराट कोहली चर्चेत राहिला. ऑस्ट्रेलियाचा तरूण फलंदाज सॅम कोनस्टास खांद्याने मारलेला धक्का कोणीच विसरू शकत नाही. तर कधी ऑस्ट्रेलियन क्रीडाप्रेमींना सँडपेपर दाखवत डिवचलं. या सर्व प्रकारावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियन क्रीडाप्रेमी हूटिंग करत असताना विराट कोहलीने इशाऱ्यातच सँडपेपरची आठवण करून दिली. त्याने रिकामी खिशात हात घालून सँडपेपर नसल्याचं दाखवलं. पण विराटच्या या कृतीमुळे टीम इंडियाचं नुकसान झाल्याचं मत सुनील गावस्कर यांनी नोंदवलं आहे.

सुनील गावस्कर यांनी सिडनी हेराल्डमध्ये लिहिलं की, ‘विराट कोहलीला हे समजलं पाहीजे की, प्रेक्षकांसोबत जे काही करतो त्यामुळे संपूर्ण संघावर दबाव येतो. प्रेक्षकांच्या निशाण्यावर येतात.’ एक दिग्गज आणि वरिष्ठ खेळाडू असातना असं करणं काही योग्य नसल्याचं मतही सुनील गावस्कर यांनी मांडलं. गावस्कर यांनी पुढे लिहिलं की, ‘कोहलीने खांदा मारला हे क्रिकेट नाही. भारतीय खेळाडू डिवचलं की उत्तर देतात. पण कोनस्टास प्रकरणात असं काहीच नव्हतं. खेळाडूंना काही वेळ गेल्यानंतर कळतं की प्रेक्षकांसोबत वाद घालून काहीच उपयोग नाही. प्रेक्षक सामन्यात आपला चांगला वेळ व्यतित करण्यासाठी आले आहे. ते वैयक्तिक कारणास्तव खेळाडूंना डिवचत नाही. ते त्यांचं मनोरंजन करण्याचा प्रकार असतो. यावर व्यक्त होण्यात काहीच अर्थ नाही. उलट नुकसान होतं.’

‘विराट कोहली वारंवार फेल होत असल्याने ऑफ स्टंपजवळील चेंडू खेळण्यास चाचपडत होता. तो टीममध्ये योगदान देऊ शकला असता. रोहित शर्माच्या फलंदाजीत काहीच खोली नव्हती आणि आपल्या फॉर्मच्या कारणास्तव संघात न खेळण्याचा धाडसी निर्णय घेतला. पण त्याने आता कसोटी क्रिकेटच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.’, असंही सुनील गावस्कर यांनी सांगितलं.

Follow Us
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा.
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य.
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?.
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला.
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका.
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार.
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले.
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला.