AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या खेळाडूंना थेट आदेश , बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी करावे लागेल हे काम

पाकिस्तानसारख्या दिग्गज संघाला पराभूत केल्याने बांग्लादेश संघाची जोरदार चर्चा रंगली आहे. दिग्गज संघानी आता धास्ती घेण्यास सुरुवात केली आहे. या कसोटी मालिकेवर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित अवलंबून आहे. त्यामुळे खेळाडूंना एक थेट आदेश दिला गेला आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंना थेट आदेश , बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी करावे लागेल हे काम
| Updated on: Sep 04, 2024 | 8:39 PM
Share

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. तत्पूर्वी भारतीय खेळाडू देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहे. ही स्पर्धा 5 सप्टेंबरपासून खेळली जाणार आहे. दुलीप ट्रॉफीत शुबमन गिल, केएल राहुल, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतसारखे दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना संपताच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंची पुढचं सर्व गणित देशांतर्गत दुलीप ट्रॉफीवर अवलंबून आहे. साधारणत: 8 सप्टेंबरला संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. संघाची निवड झाल्यानंतर खेळाडूंना आणखी एक आदेश देण्यात आला आहे. 12 सप्टेंबरला निवड झालेल्या खेळाडूंना चेपॉक मैदानावर एकत्र यायचं आहे. येथे भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सराव सुरु करणार आहे. तर बांगलादेशचा संघ 15 सप्टेंबरपासून सराव करणार आहे.

गौतम गंभीरच्या नेतृत्वात ही पहिली कसोटी मालिका आहे. यापूर्वी गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. टी20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाची वनडे मालिकेत नाचक्की झाली होती. दिग्गज खेळाडू असूनही टीम इंडियाला विजय मिळवता आला नव्हता. तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने गमवावी लागली होती. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर कोणतीही जोखीम घेण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. त्यात बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्यात भूमीवर धोबीपछाड दिल्याने धाकधूक वाढली आहे. कारण ही मालिका भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. बांगलादेशविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली तर भारताचा अंतिम फेरीसाठी दावा आणखी मजबूत होणार आहे. भारताने यापूर्वी देशात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. पहिल्या सामना गमावल्यानंतर भारताने जबरदस्त कमबॅक केलं होतं. तसेच इंग्लंडला 4-1 ने पराभूत केलं होतं. बांग्लादेश आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना 19 ते 23 सप्टेंबर आणि दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान असणार आहे.

Follow Us
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त.
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...