AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुमराह कर्णधार नको म्हणून कोणी टाकला मिठाचा खडा? टीम इंडियात जसप्रीतचा शत्रू कोण?

टीम इंडिया या वर्षातील पहिला आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. 3 जूनपासून सिडनी कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवण्याचं आव्हान आहे. असं असताना पर्थ कसोटी बुमराहला कर्णधार करण्यावरून बराच वाद झाल्याचं समोर येत आहे.

बुमराह कर्णधार नको म्हणून कोणी टाकला मिठाचा खडा? टीम इंडियात जसप्रीतचा शत्रू कोण?
| Updated on: Jan 01, 2025 | 3:24 PM
Share

रोहित शर्मा कौटुंबिक कारणास्तव पहिल्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. त्यामुळे पर्थ कसोटीत भारताचं नेतृत्व यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहने केलं होतं. या सामन्यात टीम इंडियाला यशही मिळालं. त्यानंतर उर्वरित सामन्यात टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली. पण पहिल्या सामन्यातही कर्णधारपदावरून वाद झाल्याचं माहिती समोर येत आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत एका दिग्गज खेळाडूने अंतरिम कर्णधार म्हणून दावा ठोकला होता. मीडिया रिपोर्टमध्ये सदर खेळाडूचं नाव काही समोर आलेलं नाही. पण हा वरिष्ठ खेळाडू असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्संनी काहीच शहनिशा न करता विराट कोहली असू शकतो असा दावा केला आहे. पण याबाबत ठोस अशी कोणतीच माहिती नाही. विराट कोहलीने 2022 मध्ये कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेनंतर जर टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फेरीत स्थान मिळवलं नाही, तर रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार होईल. या जागेसाठी जसप्रीत बुमराहला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. रोहित शर्मा सध्या करिअरच्या वाईट काळातून संक्रमण करत आहे. त्यामुळे सिडनी कसोटी ही त्याच्या कसोटी कारकि‍र्दीचा शेवट असेल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढे टीम इंडियाची धुरा जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवली जाऊ शकते. कारण उपकर्णधारपदाची धुरा सध्या त्याच्याच खांद्यावर आहे. पहिला कसोटी सामना भारताने 295 धावांनी जिंकला होता. तरीही कर्णधारपदावर एका वरिष्ठ खेळाडूचा डोळा असल्याचं दावा केला जात आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीची ही शेवटची आशा आहे. पण सिडनी मैदानात टीम इंडियाचा रेकॉर्ड काही खास नाही. या मैदानावर टीम इंडियाने शेवटचा सामना 1978 मध्ये जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत विजयासाठी टीम इंडियाची धडपड सुरु आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने शेवटचा कसोटी सामना जिंकला की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिकीट मिळेल. अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेशी सामना होणार आहे.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.