AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुमराह कर्णधार नको म्हणून कोणी टाकला मिठाचा खडा? टीम इंडियात जसप्रीतचा शत्रू कोण?

टीम इंडिया या वर्षातील पहिला आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. 3 जूनपासून सिडनी कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवण्याचं आव्हान आहे. असं असताना पर्थ कसोटी बुमराहला कर्णधार करण्यावरून बराच वाद झाल्याचं समोर येत आहे.

बुमराह कर्णधार नको म्हणून कोणी टाकला मिठाचा खडा? टीम इंडियात जसप्रीतचा शत्रू कोण?
| Updated on: Jan 01, 2025 | 3:24 PM
Share

रोहित शर्मा कौटुंबिक कारणास्तव पहिल्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. त्यामुळे पर्थ कसोटीत भारताचं नेतृत्व यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहने केलं होतं. या सामन्यात टीम इंडियाला यशही मिळालं. त्यानंतर उर्वरित सामन्यात टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली. पण पहिल्या सामन्यातही कर्णधारपदावरून वाद झाल्याचं माहिती समोर येत आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत एका दिग्गज खेळाडूने अंतरिम कर्णधार म्हणून दावा ठोकला होता. मीडिया रिपोर्टमध्ये सदर खेळाडूचं नाव काही समोर आलेलं नाही. पण हा वरिष्ठ खेळाडू असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्संनी काहीच शहनिशा न करता विराट कोहली असू शकतो असा दावा केला आहे. पण याबाबत ठोस अशी कोणतीच माहिती नाही. विराट कोहलीने 2022 मध्ये कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेनंतर जर टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फेरीत स्थान मिळवलं नाही, तर रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार होईल. या जागेसाठी जसप्रीत बुमराहला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. रोहित शर्मा सध्या करिअरच्या वाईट काळातून संक्रमण करत आहे. त्यामुळे सिडनी कसोटी ही त्याच्या कसोटी कारकि‍र्दीचा शेवट असेल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढे टीम इंडियाची धुरा जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवली जाऊ शकते. कारण उपकर्णधारपदाची धुरा सध्या त्याच्याच खांद्यावर आहे. पहिला कसोटी सामना भारताने 295 धावांनी जिंकला होता. तरीही कर्णधारपदावर एका वरिष्ठ खेळाडूचा डोळा असल्याचं दावा केला जात आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीची ही शेवटची आशा आहे. पण सिडनी मैदानात टीम इंडियाचा रेकॉर्ड काही खास नाही. या मैदानावर टीम इंडियाने शेवटचा सामना 1978 मध्ये जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत विजयासाठी टीम इंडियाची धडपड सुरु आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने शेवटचा कसोटी सामना जिंकला की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिकीट मिळेल. अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेशी सामना होणार आहे.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?