AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA T20 Series: भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात, दोन्ही संघातील तुल्यबळ खेळाडूंमध्ये पाहायला मिळणार संघर्ष

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने आयपीएल 2022 मध्ये 600 हून अधिक धावा केल्या. तसेच दुसरीकडे, कागिसो रबाडा सर्वाधिक 23 बळी घेणारा तिसरा गोलंदाज होता.

IND vs SA T20 Series: भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात, दोन्ही संघातील तुल्यबळ खेळाडूंमध्ये पाहायला मिळणार संघर्ष
भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवातImage Credit source: twitter
| Updated on: Jun 06, 2022 | 9:50 AM
Share

नवी दिल्ली – भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील टी-20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या स्टार खेळाडूंशिवाय भारतीय संघ खेळणार आहे. भारतात आयपीएल क्रिकेट स्पर्धेमुळे अनेक खेळाडू उदयास आले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय संघातील खेळाडू केएल राहुल टीम यांच्याकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे भारताचा सध्याचा संघ जरी नवा असला तरी संघातील खेळाडूंनी आयपीएलच्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघही मजबूत दिसत असल्याने भारतासाठी ही मालिका सोपी जाणार असं अनेक जाणकारांनी जाहीर केलं आहे. पण दोन्ही संघात संघर्ष निश्चित होईल.

केएल राहुलने आणि कागिसो रबाडामध्ये होणार संघर्ष

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने आयपीएल 2022 मध्ये 600 हून अधिक धावा केल्या. तसेच दुसरीकडे, कागिसो रबाडा सर्वाधिक 23 बळी घेणारा तिसरा गोलंदाज होता. आगामी मालिकेत रबाडा आणि कर्णधार केएल राहुल यांच्या लढतीची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. केएल राहुलला भारतीय संघासाठी शानदार खेळी खेळून चांगली धावसंख्या उभारायला मदत करायची आहे. दुसरीकडे रबाडा राहुलला लवकर बाद करण्याचा प्रयत्न करेल.

ईशान किशनने चाहत्यांची केली नाराजी

यंदाच्या आयपीएल 2022 मध्ये सलामीवीर इशान किशनची म्हणावी तितकी कामगिरी चांगली झाली नाही. त्याने फक्त 418 केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत इशानला चांगली कामगिरी करेल अशी शक्यता आहे. पण त्याला दक्षिण आफ्रिका संघातील एनरिक नॉर्शियासारख्या चांगल्या गोलंदाजांचा सामना करावा लागेल. वेगवान गोलंदाज नोर्कियाने आयपीएल 2022 मध्ये सहा सामन्यांत नऊ विकेट घेतल्या आहेत.

ऋषभ पंतला कामगिरी सुधारण्याची संधी

दिल्ली कॅपिटल्सची ओळख असलेल्या ऋषभ पंत या खेळाडूने यंदाच्या आयपीएलमध्ये 340 धावा केल्या. यंदाच्या आयपीएल मोसमात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याचे चाहते देखील निराश झाले आहेत. त्यामुळे त्याला होणाऱ्या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

त्याला चायनामन गोलंदाज तबरेझ शम्सी याच्याशी सामना करावा लागेल.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.