AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvsAUS | दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, नक्की काय काय झालं?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसातील घडामोडी जाणून घेऊयात.

INDvsAUS | दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, नक्की काय काय झालं?
| Updated on: Feb 10, 2023 | 7:34 PM
Share

नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. या दुसऱ्या दिवसातही टीम इंडियाचा बोलबाला राहिला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या एका युवा गोलंदाजानेही टीम इंडियाला नाचवलं. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर दुसऱ्या दिवशी सामन्यादरम्यान नक्की काय काय झालं, हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात

टीम इंडियाने पहिल्या दिवशी 77 धावांवर केएल राहुल याच्या रुपात एकमेव विकेट गमावली. दुसऱ्या दिवसाची सुरुवात 77 बाद 1 विकेट या धावसंख्येपासून केली. तेव्हा आर अश्विन आणि कॅप्टन रोहित शर्मा मैदानात होते. अश्विन मैदानात सेट झाला होता. पण अश्विन आऊट झाला.

अश्विननंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव हे तिघे ही आऊट झाले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर टोड मर्फी याने केएल राहुलला आऊट करत ऑस्ट्रेलिया आणि स्वत:च्या खात्यात 1 विकेट जोडली. त्यानंतर या तिघांचा काटा काढत एकूण 4 विकेट मर्फीने घेतल्या.

तर दुसऱ्या बाजूला 4 महत्वाचे विकेट्स गमावल्याने टीम इंडिया अडचणीत सापडली होती. पण नागपूरचा वाघ रोहित एक बाजू लावून होता. रोहितने या दरम्यान झुंजार शतक ठोकलं.

रोहितसाठी कर्णधार म्हणून हे शतक फार विशेष ठरलं. रोहित टीम इंडियाचा कर्णधार म्हणून टी 20, वनडे आणि कसोटी अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला.

रोहित शतकानंतर झोकात खेळेत होता. मात्र मर्फीनेच रोहितचा काटा काढला. मर्फीने रोहितला 120 धावांवर क्लीन बोल्ड केलं. अशाप्रकारे मर्फीने ऑस्ट्रेलियाची डोकेदुखीही संपवली. तसेच पदार्पणातच 5 विकेट्स घेतल्या.

रोहित आऊट झाल्याने टीम इंडिया डाव गडबडला. रोहित पाठोपाठ केएस भरतही माघारी परतला. मात्र त्यानंतर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने कांगारुंना बॉलिंगनंतर बॅटिंगने नाचवलं. या जोडीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 81 धावांची नाबाद भागीदारी केली. तसेच दोघांनी वैयक्तिक अर्धशतकही ठोकली.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या 114 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 321 धावा केल्या. जडेजा 66 तर अक्षर 52 धावांवर नाबाद आहेत. टीम इंडिया 144 धावांनी आघाडीवर आहे. त्यामुळे आता ही जोडी तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला आणखी किती धावांची आघाडी मिळवून देते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाची आकडेवारी थोडक्यात

टीम इंडिया : 7 बाद 321 धावा, 114 ओव्हर, 144 धावांची आघाडी. रवींद्र जडेजा – 66* अक्षर पटेल – 52*

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.