AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDA vs AFGA : इंडिया उलटफेरची शिकार, अफगाणिस्तान विरुद्ध 349 धावा करुनही पराभूत, काय झालं?

Afghanistan A vs India Match Result : भारतीय संघाने अफगाणिस्तानसमोर 350 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र त्यानंतरही भारतीय संघाला डीएलएसनुसार 4 धावांनी पराभूत व्हावं लागलंय.

INDA vs AFGA : इंडिया उलटफेरची शिकार, अफगाणिस्तान विरुद्ध 349 धावा करुनही पराभूत, काय झालं?
Tilak Vaibahv India A TeamImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 11, 2026 | 10:32 PM
Share

क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. ट्राय नॅशन ए सीरिज 2026 स्पर्धेत टीम इंडिया ए मोठ्या उलटफेरची शिकार झाली आहे. अफगाणिस्तानने भारतावर 4 धावांनी मात करत मोठा उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानने या विजयासह भारताला सलग दुसऱ्या विजयापासून रोखलं आहे. भारताने या मालिकेत यजमान श्रीलंकेला पराभूत करुन विजयी सलामी दिली होती. त्यामुळे भारताला अफगाणिस्तानवर मात करुन सलग दुसरा सामना जिंकण्याची संधी होती. मात्र अफगाणिस्तानने भारताचा 4 धावांनी गेम केला आणि आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यात यश मिळवलं.

पावसामुळे भारतीय संघाचा गेम

अफगाणिस्ताने या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. पावसाने खोडा घातल्याने काही वेळ वाया गेला. त्यामुळे 1 ओव्हर कापण्यात आली. भारताने 49 ओव्हरमध्ये 349 धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला 350 धावांचं आव्हान मिळालं. मात्र पावसाने दुसऱ्या डावातही खोडा घातला. त्यामुळे अफगाणिस्तानला सुधारित आव्हान मिळालं. मात्र पावसाने सामन्याची मजा घालवली. पावसाच्या सातत्यपूर्ण व्यत्ययामुळे अखेर सामन्याचा निकाल लावण्यात आला. अफगाणिस्तानला अशाप्रकारे डीएलएसनुसार 4 धावांनी विजेता घोषित करण्यात आलं. अफगाणिस्तानने 25.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 177 धावा केल्या.  अफगाणिस्तानसाठी कर्णधार इम्रान मीर याने सर्वाधिक धावा केल्या. इम्रानने 70 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरसह नॉट आऊट 75 रन्स केल्या. बहीर शाह याने 52 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या.

पहिला डाव, टीम इंडियाची जोरदार बॅटिंग

पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदांजाची जोरदार धुलाई केली. त्यामुळे भारताला 49 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 349 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतासाठी एकूण 5 फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. प्रभसिमरन सिंह याने सर्वाधिक 84 धावा केल्या. कर्णधार तिलक वर्मा आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाड या दोघांनी प्रत्येकी 66-66 धावा केल्या. वैभव सूर्यवंशी याने 44 तर सूर्यांश शेडगे याने 40 धावांचं योगदान दिलं. तसेच अफगाणिस्तानकडून अब्दुल्लाह अहमदझई याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या.

भारताचा डीएलएसनुसार 4 धावांनी पराभव

टीम इंडियाचा तिसरा सामना केव्हा?

दरम्यान टीम इंडिया ट्राय सीरिजमधील आपला तिसरा सामना हा यजमान श्रीलंका ए विरुद्ध होणार आहे. उभयसंघातील सामना हा सोमवारी 15 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. भारतासाठी अंतिम फेरीच्या हिशोबाने हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Follow Us
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य