डरबन – जवळपास 15 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला होता. त्याच देशात 15 वर्षानंतर नवीन कॅप्टन शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या मुलींनी त्या इतिहासाची पुनरावृत्ती केली. आयसीसीने पहिल्यांदा आयोजित केलेल्या महिला अंडर-19 T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडला हरवून इतिहास रचला. पोचेफस्टूममध्ये रविवारी 29 जानेवारीला फायनलचा सामना झाला. भारताने इंग्लंडवर 7 विकेट राखून विजय मिळवत पहिल्यांदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवला. भारत महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा विश्वविजेता बनलाय.