AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: Rohit sharma ने कौतुक केलं, त्याच खेळाडूचा टीम मधून पत्ता कट

IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजसाठी (IND vs WI) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

IND vs WI: Rohit sharma ने कौतुक केलं, त्याच खेळाडूचा टीम मधून पत्ता कट
Rohit sharmaImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 14, 2022 | 3:59 PM
Share

मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजसाठी (IND vs WI) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. तीन खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. एक मॅचविनर खेळाडूला संघात स्थान मिळालेलं नाही. उमरान मलिकला (Umran Malik) या सीरीजसाठी संघात स्थान मिळालेलं नाही. आयपीएल 2022 (IPL 2022) मधील शानदार प्रदर्शनानंतर या खेळाडूला संघात निवडण्यात आलं होतं. आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध उमरानला संघात संधी मिळाली. पण त्याला प्रभाव पाडता आला नाही. आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी त्याला संधी मिळालेली नाही. म्हणजे उमरान इंग्लंड वरुन थेट भारतात परतेल. त्याचे सहकारी वेस्ट इंडिजला रवाना होतील.

उमरानला का वगळलं?

उमरानला इंग्लंड आणि आयर्लंड सीरीज मध्ये तीन टी 20 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने दोन विकेट काढले. प्रति ओव्हर त्याचा इकॉनमी रेट 12.44 होता. इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात त्याने 4 ओव्हर्स मध्ये 56 धावा दिल्या.

रोहित शर्माच्या कौतुकानंतर उमरानला संघातून वगळलं

रोहित शर्माने सुद्धा उमरान मलिकच कौतुक केलं होतं. “उमरान आमच्या योजनेचा भाग आहे. उमरानला ज्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे, ते आम्ही त्याला समजावतोय. एक वेळ अशी येईल, जेव्हा आम्ही आमच्या युवा खेळाडूंना संधी देऊ. उमरान शानदार गोलंदाज आहे” असं रोहित म्हणाला होता. रोहित शर्माच्या कौतुकानंतर उमरानला संघातून वगळलं.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीचा भारतीय संघ

रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.