AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat-Anushka Love Story : पहिल्या भेटीतच संताप, मैत्री आणि लग्न, अशी आहे विराट-अनुष्काची लव्हस्टोरी

'व्हॅलेंटाईन विकला अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्वांनाच 'व्हॅलेंटाईन डे चे वेध लागले आहेत. या निमित्ताने आपण विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांची लव्ह स्टोरी आपण जाणून घेणार आहोत.

Virat-Anushka Love Story : पहिल्या भेटीतच संताप, मैत्री आणि लग्न, अशी आहे विराट-अनुष्काची लव्हस्टोरी
| Updated on: Feb 03, 2023 | 7:51 PM
Share

मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं फार जुनं आहे. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांनी अनेक वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर अखेर लगीनगाठ बांधली. दोघांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीत लग्न केलं. त्यानंतर भारतात परतल्यावर दोघांनी दिल्ली आणि मुंबईत जंगी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. व्हेलेंटाईन वीकला अवघे काही दिवस राहिले आहेत. या व्हेलंटाईन वीकच्या निमित्ताने या दोघांनी लव्हस्टोरी कशी होती, हे आपण जाणून घेणार आहोत.

पहिली भेट कशी झाली?

विराट आणि अनुष्काच्या पहिल्या भेटीचा किस्सा अगदी भन्नाट आहे. दोघेही एका जाहिरातीनिमित्त पहिल्यांदा 2013 मध्ये भेटले होते. पहिली भेटीत मी फार घाबरलो होतो. ही भीती नाहीशी करण्यासाठी आणि अनुष्कासोबत बोलण्यासाठी जोक मारला होता. जाहिरातीदरम्यान अनुष्का विराटपेक्षा उंच दिसत होती. यावर विराटने जोक केला. “तुला वाटत नाही का तु फार उंच हिल्स घालतेस”, असं विराट म्हणाला.

विराटच्या या जोकवर अनुष्काचा पारा चढला. “एक्सक्यूज मी”, अशा 2 शब्दातच अनुष्काने आपला राग व्यक्त केला. अनुष्काच्या या प्रतिक्रियेमुळे भलतीच स्थिती निर्माण झाली. मात्र त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली.

अनुष्काला फ्लाइंग किस

विराटने 2014 मध्ये शतक ठोकलं. या सामन्याला अनुष्काही उपस्थित होती. विराटने सेंच्युरी पूर्ण केल्यानंतर अनुष्काच्या दिशेने पाहिलं. भर मैदानात विराटने अनुष्काला फ्लाईंग किस दिलं. या मॅचनंतर विराट-अनुष्का जवळ आले. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि मग ‘बँड बाजा बारात’.

कन्यारत्न

लग्नाच्या 4 वर्षांनी दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं. अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. या दोघांनी आपल्या लेकीचं नाव वामिका असं ठेवलं.

कमाई

विराट-अनुष्का दोघांची कमाईही जबरदस्त आहे. जीक्यू इंडियन मॅगजीननुसार, विराटची एकूण संपत्ती ही 900 कोटींची आहे. तर अनुष्काकडे 350 कोटींची संपत्ती आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...