AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियात जागा न मिळाल्याने या खेळाडूने सोशल मीडियावर काढला राग! क्रिप्टीक पोस्ट होतेय व्हायरल

टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु असातना झिम्बाब्वे विरूद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. असं असताना एका खेळाडूची क्रिप्टीक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टीम इंडियात जागा न मिळाल्याने या खेळाडूने सोशल मीडियावर काढला राग! क्रिप्टीक पोस्ट होतेय व्हायरल
| Updated on: Jun 24, 2024 | 11:23 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना भविष्याच्या दृष्टीने टीमची बांधणी सुरु झाली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातून या संघाची चाचपणी सुरु होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया पाच सामन्याची टी2 मालिका खेळणार आहे. या संघात आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या बहुतांश खेळाडूंची निवड केली आहे. पण आयपीएल 2024 स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला डावलण्यात आलं आहे. त्यामुळे त्याने आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा क्रीडाप्रेमी करत आहेत. हा खेळाडू दुसरा तिसरा नसून कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयात योगदान देणारा वरुण चक्रवर्ती आहे. वरुण चक्रवर्तीला टीम इंडियात स्थान मिळालेल नाही. वरुण चक्रवर्तीने 2024 आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू ठरला होता. पण त्याचा विचार संघासाठी केला गेला नाही.

वरुण चक्रवर्तीने टीम इंडियाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर एक क्रिप्टीक पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे. क्रिप्टीक पोस्टचा संदर्भ निवडीशी जोडला जात आहे. संघाची घोषणा झाल्यावरच अशी पोस्ट करण्याचं कारण काय? असा प्रश्नही क्रीडाप्रेमींनी विचारला आहे. वरुण चक्रवर्तीने लिहिलं की, खरंच, माझ्याकडे पेड पीआर एजन्सी हवी होती. त्यानंतर आणखी एका इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं की, देवा मला त्या गोष्टी स्वीकार करण्यासाठी शांती प्रदान कर. ज्या मी बदलू शकत नाही. ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्यासाठी मला शक्ती दे. फरक जाणून घेण्याची बुद्धी दे.

Varun_Chakravarty_Post

आयपीएल 2024 स्पर्धेत वरुण चक्रवर्ती 15 सामने खेळला वरुण चक्रवर्तीने आयपीएलमध्ये 8.04 च्या इकोनॉमी रेटने एकूण 21 विकेट घेतल्या. टीम इंडियासाठी वरुण चक्रवर्ती 6 टी20 सामने खेळला असून त्यात फक्त 2 विकेट घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्ती 2021 टी20 वर्ल्डकपमध्ये शेवटचा सामना खेळला होता.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील कुमार, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं