AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली नागपूर कसोटी आधी मोठ्या टेन्शनमध्ये, ट्विट करत दिली माहिती

युवा खेळाडूंसाठी कायम प्रेरणास्थान असलेला विराट कोहली नाराज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधी असं काय झालं की कोहली टेन्शनमध्ये आला आहे.

विराट कोहली नागपूर कसोटी आधी मोठ्या टेन्शनमध्ये, ट्विट करत दिली माहिती
virat kohli
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 07, 2023 | 8:34 PM
Share

मुंबई : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दोन्ही संघ तयारीला लागले असून कसोटी मालिका खिशात घालण्यासाठी कांगारू प्लॅन करत आहेत. मात्र त्याआधी भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली हताश झाला असून त्याने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. युवा खेळाडूंसाठी कायम प्रेरणास्थान असलेला विराट कोहली नाराज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधी असं काय झालं की कोहली दु: खी झाला आहे.

नेमकं काय घडलं? नागपूर कसोटीआधी विराट कोहलीचा नवा कोरा मोबाईल हरवला आहे फोन हरवल्यामुळे कोहली नाराज आहे. कारण कोहलीने त्या फोनचा बॉक्सही उघडला नव्हता आणि मोबाईल हरवला आहे. कोहलीने ट्विटमध्ये, तुमचा नवीन फोन जो अनबॉक्स करण्याआधीच हरवला जातो. यापेक्षा मोठं दु:ख नसून माझा नवीन फोन कोणी पाहिला आहे का? असं म्हटलं आहे.

आपण नवीन फोन असो किंवा दुसरी एखादी वस्तु ती तुम्ही घेतलीत आणि अनबॉक्स करण्याआधीच गहाळ झाली. त्यानंतर जे काही दु:ख होत याची आपण कल्पना करू शकत नाही. कोहली नाराज झाल्यामुळे याचा त्याच्या खेळावर काही परिणाम तर होणार नाही याची चिंता चाहत्यांना लागली आहे.

नागपूरमध्ये कसोटीमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. विराट कोहली भारताचा महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. कोहलीसह टीम इंडियाचे बाकीचे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकण्यासाठी तयारी करत आहेत. सरावावेळी कोहलीने स्वीप आणि रिव्हर्स या दोन शॉटवर कसून सराव केला आहे. कांगारूंच्या मैदानांवर खेळताना विराटने मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. मात्र तशीच कामगिरी भारतात करण्याचा विराटचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेच्या जोरावर भारत कसोटी विश्वचषकाच्या क्रमवारीत आपलं स्थान भक्कम करणार आहे. भारताला चार सामन्यांमधील किमान तीन सामने जिंकावे लागणार आहेत.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार