AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-इंग्लंड मालिकेत ‘हा’ खेळाडू सर्वांत जास्त रन्स करणार, इंग्लंडच्या दिग्गजाची आणखी एक भविष्यवाणी!

आगामी भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहली सगळ्यात जास्त धावा करेल, असं भाकित मॉन्टी पनेसरने केलं आहे. (Virat kohli Maximum Runs in india vs England test Series Says Monty Panesar)

भारत-इंग्लंड मालिकेत 'हा' खेळाडू सर्वांत जास्त रन्स करणार, इंग्लंडच्या दिग्गजाची आणखी एक भविष्यवाणी!
माँटी पनेसर (इंग्लंडचा माजी फिरकीपटू)
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: May 29, 2021 | 8:28 AM
Share

मुंबई : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड (India Tour of England) दौऱ्यावर जातोय. येत्या 2 जूनला इंग्लंडला रवाना होण्यासाठी भारतीय संघ टेक ऑफ करेल. भारत आणि न्यूझीलंड (India vs Nea Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final 2021) अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान साउथहॅम्प्टन येथे खेळविला जाणार आहे. या सामन्यानंतर भारताला इंग्लंड (India vs England) विरोधात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. एकंदरीतच भारताच्या इंग्लंड दौऱ्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागलंय.  अशातच  इंग्लंडचा माजी दिग्गज फिरकीपटू मॉन्टी पनेसरने (Monty Panesar) आणखी एक भविष्यवाणी केली आहे. (Virat kohli Maximum Runs in india vs England test Series Says Monty Panesar)

आगामी भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहली सगळ्यात जास्त धावा करेल, असं भाकित मॉन्टी पनेसरने केलं आहे. याअगोदर भारत इंग्लंडला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 5-0 ने नेस्तनाबूत करेल, अशी भविष्यवाणी म़ॉन्टीने केली होती. त्यानंतर आता इंग्लंड दौऱ्यात विराट सर्वाधिक रन्स करेल, असं मॉन्टीने म्हटलंय.

इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीची बॅट तळपणार

आगामी इंग्लंड दौऱ्यात विराटची बॅट चांगलीच तळपेल असा विश्वास व्यक्त करताना माँन्टीने भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये विराट कोहली सर्वाधिक रन्स करेल, असं भाकित वर्तवलंय. तो इंडिया टुडेशी बोलत होता. या मुलाखतीत त्याने आगामी भारत इंग्लंड मालिकेविषयी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.

भारत इंग्लंडला 5-0 ने आस्मान दाखवेल, माँन्टीची पहिली भविष्यवाणी

“भारतीय संघ अतिशय योग्य वेळी इंग्लंडचा दौरा करत आहे. कारण भारतीय संघातले सगळेच खेळाडू तुफान फॉर्मात आहेत. ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमधील वातावरणात गरमी असेल. याचाच फायदा भारतीय संघ घेऊ शकतो. संघात दोन फिरकीपटूंना संधी देऊन इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 म्हणजेच क्लिन स्वीप देण्याची धमक भारतीय संघात आहे, अशी भविष्यवाणी माँन्टी पनेसरने केली प्रथमत: केली होती.

…तर विदेशातला सगळ्यात मोठा विजय

“भारतीय संघातील खेळाडू दमदार आहेत तसंच तुफान फॉर्मात देखील आहेत. त्यामुळे इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 असं हरवून भारत क्लिन स्वीप देऊ शकतो, तशी ताकद भारतीय संघात आहे. जर भारतीय संघाने अशी कामगिरी केली तर विदेशात भारतासाठी हा सगळ्यात मोठा विजय असेल”, असंही माँटी म्हणाला होता.

(Virat kohli Maximum Runs in india vs England test Series Says Monty Panesar)

हे ही वाचा :

KKR चा फलंदाज राहुल त्रिपाठीवर पुणे पोलिसांची कारवाई, दंडही ठोठावला!

भारत विराट कोहलीपेक्षा जास्त रवी शास्त्रींची टीम, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं वक्तव्य

‘बाहुबली रिषभ पंत’, टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसोबत काय करतोय?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली