AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडिया ‘इतके’ दिवस क्वारंटाईन राहणार, जाणून घ्या विराटसेनेचा प्लॅन

टीम इंडिया (Team India) जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर (tour of England) जाणार आहे. या दौऱ्यात विराटसेना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (World Test Championship 2021) अंतिम सामना आणि इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.

Team India | इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडिया 'इतके' दिवस क्वारंटाईन राहणार, जाणून घ्या विराटसेनेचा प्लॅन
टीम इंडिया (Team India)
| Updated on: May 08, 2021 | 10:28 PM
Share

मुंबई : टीम इंडिया (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) आणि त्यानंतर कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर (India Tour England 2021) जाणार आहे. विराटसेना 18-22 जूनदरम्यान न्यूझीलंड विरुद्ध विजेतेपदासाठी भिडणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी टीम इंडिया भारतात 8 दिवस क्वारंटाईन राहणार आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. (Team India will be in the quarantine before the World Test Championship 2021 and the tour of England)

अधिकाऱ्याने काय म्हटलं?

“इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू 25 मे ला मुंबईत एकत्र जमतील. त्यानंतरच्या पुढील 8 दिवस हे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसह बायो बबलमध्ये राहतील. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतीय संघ 2 जूनला इंग्लंडसाठी रवाना होईल. त्यानंतर पुन्हा इंग्लंडला पोहचल्यानंतर या खेळाडूंना 10 दिवस क्वारंटाईन रहावं लागणार आहे. या दरम्यान खेळाडूंची कोरोना चाचणीही केली जाईल.

कुटुंबियांना सोबत घेऊन येण्याची परवानगी

भारतीय संघाचा 3 महिन्यांचा लांबलचक असा दौरा आहे. खेळाडूंना बायोबबलमध्ये राहणं आव्हानात्मक असंत. त्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेण्याची परवानगी दिली आहे.

विजेतेपदासाठी दोन्ही संघांमध्ये 18-22 जूनमध्ये लढत रंगेल. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाला 10 पेक्षा अधिक दिवसांचा अवधी असेल. अवघ्या काही महिन्यांपूर्वी इंग्लंड भारत दौऱ्यावर आली होती. या दौऱ्यातर भारताने इंग्लंडचा कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय अशा तिनही मालिकेत पराभव केला होता. त्यामुळे या पराभवाचा वचपा घेण्याचा मानस इंग्लंडचा असेल. तर ही विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा मानस विराटसेनेचा असणार आहे. यामुळे कोणता संघ वरचढ ठरणार, हे पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल.

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 22 जून, साउथ्मपटन

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा (फिटनेस टेस्ट आवश्यक)

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नाग्वासवाला.

संबंधित बातम्या :

कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवर हिरावले, क्रीडा विश्वावर शोककळा

PHOTO | सचिन, विराटनंतर रिषभ पंत कोरोना विरुद्धच्या लढ्यात मैदानात, ‘या’ संस्थेद्वारे करणार मदत

(Team India will be in the quarantine before the World Test Championship 2021 and the tour of England)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.