AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs PAK: विराट कोहलीला पाकिस्तानचा संघ इतका का घाबरतो? जाणून घ्या 4 कारणं

आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला भिडणार आहेत. या महामुकाबल्याकडे कोट्यवधी फॅन्सचे लक्ष लागले आहे. या सामन्यात सगळ्यांची नजर विराट कोहलीवर (Virat Kohli) सुद्धा असणार आहे.

IND Vs PAK: विराट कोहलीला पाकिस्तानचा संघ इतका का घाबरतो? जाणून घ्या 4 कारणं
Virat kohli Image Credit source: AFP
| Updated on: Aug 24, 2022 | 1:20 PM
Share

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला भिडणार आहेत. या महामुकाबल्याकडे कोट्यवधी फॅन्सचे लक्ष लागले आहे. या सामन्यात सगळ्यांची नजर विराट कोहलीवर (Virat Kohli) सुद्धा असणार आहे. कारण तो आशिया कप स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. विराट कोहलीने नेहमीच पाकिस्तानी (Pakistan) गोलंदाजांना रडवलं आहे. विराट कोहलीने बहुतांशवेळा पाकिस्तान विरुद्ध दमदार फलंदाजी केली आहे. त्याचं चमकदार प्रदर्शन याचा पुरावा आहे. यावेळी आशिया कप मध्ये विराट कोहली पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतो. त्यामागची पाच कारणं समजून घ्या.

  1. विराट कोहलीचा पाकिस्तान विरुद्ध टी 20 रेकॉर्ड कमालीचा आहे. त्याने पाकिस्तान विरुद्ध 7 सामन्यात 311 धावा केल्या आहेत. विराट कोहलीची फलंदाजीची सरासरी 77.75 आहे. टी 20 क्रिकेट मध्ये पाकिस्तान विरुद्ध त्याने तीन अर्धशतकं झळकावली आहेत.
  2. आशिया कप बद्दल बोलायच झाल्यास, विराट कोहलीची पाकिस्तान विरुद्ध सरासरी 68 पेक्षा जास्त आहे. विराटने 3 सामन्यात 206 धावा केल्या आहेत. पाकिस्तान विरुद्ध त्याने एक शतक झळकावलं आहे. आशिया कप मध्येच विराट कोहली पाकिस्तान विरुद्ध 183 धावांची इनिंग खेळला होता. ते त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे.
  3. विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध टी 20 फॉर्मेट मध्ये एकूण 2 शतकं झळकावली आहेत. त्याचबरोबर दोन अर्धशतकही ठोकली आहेत. लिमिटेड ओव्हर फॉर्मेट मध्ये प्रत्येक स्पर्धेत कोहलीने पाकिस्तान विरुद्ध कमालीच प्रदर्शन केलं आहे.
  4. दुबई मध्ये ज्या मैदानात भारत-पाकिस्तान भिडणार आहेत, तिथेही विराट कोहलीने शानदार अर्धशतक फटकावलं आहे. 2021 टी 20 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध हे अर्धशतक झळकावलं होतं. भारताने त्या सामन्यात रोहित, केएल राहुल आणि सूर्यकुमारचे विकेट लवकर गमावले होते. पण विराट कोहलीने डाव संभाळला व 57 धावांची इनिंग खेळला. टीम इंडियाने हा सामना गमावला होता.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....