AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli: मोठी बातमी, कर्णधार म्हणून BCCI ने 100 व्या कसोटीसाठी दिलेली ऑफर विराटने धुडकावली

विराट कोहलीने (Virat Kohli) शनिवारी अचानक कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देऊन सर्वांनाचा धक्का दिला. विराटने टि्वटरवर स्टेटमेंट पोस्ट करुन कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर करताना BCCI चे आभार मानले.

Virat Kohli: मोठी बातमी, कर्णधार म्हणून BCCI ने 100 व्या कसोटीसाठी दिलेली ऑफर विराटने धुडकावली
Virat Kohli
| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 4:52 PM
Share

बंगळुरु: विराट कोहलीने (Virat Kohli) शनिवारी अचानक कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देऊन सर्वांनाचा धक्का दिला. विराटने टि्वटरवर स्टेटमेंट पोस्ट करुन कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर करताना BCCI चे आभार मानले. दरम्यान कर्णधार म्हणून निरोपाचा कसोटी सामना खेळण्यासाठी BCCI ने विराटला ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. कर्णधार म्हणून 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी विराटला प्रस्ताव देण्यात आला होता. शुक्रवारी विराट बरोबर फोनवरुन बोलणं झालं, त्यावेळी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विराटला कॅप्टन म्हणून बंगळुरुमध्ये खेळण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.

बंगळुरु त्याचं दुसर घर

विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार होता. त्यामुळे एकाअर्थाने बंगळुरु त्याचं दुसर घर आहे. त्यामुळे त्याला बंगळुरुत 100 वा कसोटी सामना खेळण्याची ऑफर देण्यात आली होती. पण विराटने या प्रस्तावामध्ये रस दाखवला नाही व नकार दिला. क्रिकट्रॅकर वेबसाईटने हे वृत्त दिलं आहे. ‘एक मॅचने फरक पडत नाही, मी असा नाहीय’ असे विराटने समोरच्या व्यक्तीला म्हटलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 2-1 अशी हरल्यानंतर विराटने दुसऱ्याचदिवशी कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

विराटच्या या राजीनाम्यान भारतीय क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विराटने टी-20 चे कर्णधारपद स्वत:हून सोडले होते. पण त्याला वनडेची कॅप्टनशिप सोडायची नव्हती. पण त्याला वनडे कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. त्यावरुन बरेच वाद-विवाद झाले.

ज्या जबाबदाऱ्या, दबाव येत होता

विराटला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून ज्या जबाबदाऱ्या, दबाव येत होता. त्यातून सुटका करुन घेण्यासाठी त्याने राजीनामा दिला असं बोलल जातयं. विराटच्या राजीनाम्यानंतर वेगवेगळी मत व्यक्त होत आहेत. राजीनाम्याचा निर्णय घेण्याआधी विराटने हेड कोच राहुल द्रविड, ड्रेसिंग रुमममध्ये संघातील सहकारी आणि त्यानंतर बीसीसीआय पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

संबंधित बातम्या: सरावासाठी रोज पुणे-मुंबई प्रवास, भाड्याच्या घरात राहून सराव, लोणावळ्याच्या पठ्ठ्याचा U-19 World Cup मध्ये धुमाकूळ Pat Cumminss: कमिन्सने उस्मान ख्वाजाच्या मुस्लिम धर्माचा मान ठेवला, मैदानावरच्या कृतीने मन जिंकलं, पाहा VIDEO IPL 2022 ‘हा’ मोठा खेळाडू मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होणार नाही, पराभवामुळे भंग पावलं स्वप्न

(Virat Kohli rejected the offer of playing his 100th Test as Indias skipper in Bengaluru)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.