AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा पराभवाला जबाबदार कोण? पाहा काय वाटतंय क्रिकेट चाहत्यांना

Team India : भारतीय संघाच्या पराभवाला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल. १० सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासाठी तुम्ही कोणाला जबाबदार ठरवता. तुमची प्रतिक्रिया काय?

टीम इंडियाचा पराभवाला जबाबदार कोण? पाहा काय वाटतंय क्रिकेट चाहत्यांना
team india
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 21, 2023 | 5:38 PM
Share

India vs Australia : टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्यात अपयश ठरला. गेल्या 12 वर्षांपासून विश्वचषकाचे स्वप्न अपूरे राहिले. यंदा भारताकडे मोठी संधी होती. पण २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव नेमका कशामुळे झाला. कोण याला जबाबदार आहे.

सलग १० सामने जिंकण्यात यश

टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकले होते. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. भारतीय संध वर्ल्डकप नक्कीच जिंकेल अशी आशा प्रत्येकाला होती. पण तसे होऊ शकले नाही. भारतीय फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी ही १० सामन्यात चांगली कामगिरी केली. तर टीम इंडियाच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवामागे कोण जबाबदार आहे यासंदर्भात अनेकांच्या वेगवेगळी मते आहेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील तुमचं मत मांडू शकता. कमेंट करुन तुमचं मत मांडा.

पराभवाला जबाबदार कोण?

जवळपास  ६० टक्के लोकांना असे वाटते की, फलंदाजीमुळे भारतीय टीमचा पराभव झाला. टीम इंडियाच्या पराभवाला अनेकांनी फलंदाजीला दोषी ठरवले आहे. तर १० टक्के लोकांना असं वाटतं की, गोलंदाजीमुळे भारतीय संघाचा पराभव झाला. १० टक्के लोकांना असे ही वाटते की, भारतीय टीमच्या खराब फिल्डिंगमुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र २० टक्के लोकांना असे वाटते की,  टॉसमुळे टीम इंडियाचा पराभव झाला.

फायनल सामन्यात भारताचा पराभव

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. भारतीय संघाने सर्वबाद 240 धावा केल्या. भारतीय संघाकडून केएल राहुलने 107 बॉलमध्ये 66 धावा केल्या. तर विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावले आणि भारताच्या विजयाची घौडदोड रोखली.

Follow Us
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे.
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,.
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत....
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप.