AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा पराभवाला जबाबदार कोण? पाहा काय वाटतंय क्रिकेट चाहत्यांना

Team India : भारतीय संघाच्या पराभवाला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल. १० सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासाठी तुम्ही कोणाला जबाबदार ठरवता. तुमची प्रतिक्रिया काय?

टीम इंडियाचा पराभवाला जबाबदार कोण? पाहा काय वाटतंय क्रिकेट चाहत्यांना
team india
| Updated on: Nov 21, 2023 | 5:38 PM
Share

India vs Australia : टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्यात अपयश ठरला. गेल्या 12 वर्षांपासून विश्वचषकाचे स्वप्न अपूरे राहिले. यंदा भारताकडे मोठी संधी होती. पण २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव नेमका कशामुळे झाला. कोण याला जबाबदार आहे.

सलग १० सामने जिंकण्यात यश

टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकले होते. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. भारतीय संध वर्ल्डकप नक्कीच जिंकेल अशी आशा प्रत्येकाला होती. पण तसे होऊ शकले नाही. भारतीय फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी ही १० सामन्यात चांगली कामगिरी केली. तर टीम इंडियाच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवामागे कोण जबाबदार आहे यासंदर्भात अनेकांच्या वेगवेगळी मते आहेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील तुमचं मत मांडू शकता. कमेंट करुन तुमचं मत मांडा.

पराभवाला जबाबदार कोण?

जवळपास  ६० टक्के लोकांना असे वाटते की, फलंदाजीमुळे भारतीय टीमचा पराभव झाला. टीम इंडियाच्या पराभवाला अनेकांनी फलंदाजीला दोषी ठरवले आहे. तर १० टक्के लोकांना असं वाटतं की, गोलंदाजीमुळे भारतीय संघाचा पराभव झाला. १० टक्के लोकांना असे ही वाटते की, भारतीय टीमच्या खराब फिल्डिंगमुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र २० टक्के लोकांना असे वाटते की,  टॉसमुळे टीम इंडियाचा पराभव झाला.

फायनल सामन्यात भारताचा पराभव

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. भारतीय संघाने सर्वबाद 240 धावा केल्या. भारतीय संघाकडून केएल राहुलने 107 बॉलमध्ये 66 धावा केल्या. तर विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावले आणि भारताच्या विजयाची घौडदोड रोखली.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....