AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा पराभवाला जबाबदार कोण? पाहा काय वाटतंय क्रिकेट चाहत्यांना

Team India : भारतीय संघाच्या पराभवाला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल. १० सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासाठी तुम्ही कोणाला जबाबदार ठरवता. तुमची प्रतिक्रिया काय?

टीम इंडियाचा पराभवाला जबाबदार कोण? पाहा काय वाटतंय क्रिकेट चाहत्यांना
team india
| Updated on: Nov 21, 2023 | 5:38 PM
Share

India vs Australia : टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्यात अपयश ठरला. गेल्या 12 वर्षांपासून विश्वचषकाचे स्वप्न अपूरे राहिले. यंदा भारताकडे मोठी संधी होती. पण २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव नेमका कशामुळे झाला. कोण याला जबाबदार आहे.

सलग १० सामने जिंकण्यात यश

टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकले होते. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. भारतीय संध वर्ल्डकप नक्कीच जिंकेल अशी आशा प्रत्येकाला होती. पण तसे होऊ शकले नाही. भारतीय फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी ही १० सामन्यात चांगली कामगिरी केली. तर टीम इंडियाच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवामागे कोण जबाबदार आहे यासंदर्भात अनेकांच्या वेगवेगळी मते आहेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील तुमचं मत मांडू शकता. कमेंट करुन तुमचं मत मांडा.

पराभवाला जबाबदार कोण?

जवळपास  ६० टक्के लोकांना असे वाटते की, फलंदाजीमुळे भारतीय टीमचा पराभव झाला. टीम इंडियाच्या पराभवाला अनेकांनी फलंदाजीला दोषी ठरवले आहे. तर १० टक्के लोकांना असं वाटतं की, गोलंदाजीमुळे भारतीय संघाचा पराभव झाला. १० टक्के लोकांना असे ही वाटते की, भारतीय टीमच्या खराब फिल्डिंगमुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र २० टक्के लोकांना असे वाटते की,  टॉसमुळे टीम इंडियाचा पराभव झाला.

फायनल सामन्यात भारताचा पराभव

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. भारतीय संघाने सर्वबाद 240 धावा केल्या. भारतीय संघाकडून केएल राहुलने 107 बॉलमध्ये 66 धावा केल्या. तर विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावले आणि भारताच्या विजयाची घौडदोड रोखली.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.