AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा पराभवाला जबाबदार कोण? पाहा काय वाटतंय क्रिकेट चाहत्यांना

Team India : भारतीय संघाच्या पराभवाला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल. १० सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासाठी तुम्ही कोणाला जबाबदार ठरवता. तुमची प्रतिक्रिया काय?

टीम इंडियाचा पराभवाला जबाबदार कोण? पाहा काय वाटतंय क्रिकेट चाहत्यांना
team india
| Updated on: Nov 21, 2023 | 5:38 PM
Share

India vs Australia : टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्यात अपयश ठरला. गेल्या 12 वर्षांपासून विश्वचषकाचे स्वप्न अपूरे राहिले. यंदा भारताकडे मोठी संधी होती. पण २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव नेमका कशामुळे झाला. कोण याला जबाबदार आहे.

सलग १० सामने जिंकण्यात यश

टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकले होते. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. भारतीय संध वर्ल्डकप नक्कीच जिंकेल अशी आशा प्रत्येकाला होती. पण तसे होऊ शकले नाही. भारतीय फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी ही १० सामन्यात चांगली कामगिरी केली. तर टीम इंडियाच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवामागे कोण जबाबदार आहे यासंदर्भात अनेकांच्या वेगवेगळी मते आहेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील तुमचं मत मांडू शकता. कमेंट करुन तुमचं मत मांडा.

पराभवाला जबाबदार कोण?

जवळपास  ६० टक्के लोकांना असे वाटते की, फलंदाजीमुळे भारतीय टीमचा पराभव झाला. टीम इंडियाच्या पराभवाला अनेकांनी फलंदाजीला दोषी ठरवले आहे. तर १० टक्के लोकांना असं वाटतं की, गोलंदाजीमुळे भारतीय संघाचा पराभव झाला. १० टक्के लोकांना असे ही वाटते की, भारतीय टीमच्या खराब फिल्डिंगमुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र २० टक्के लोकांना असे वाटते की,  टॉसमुळे टीम इंडियाचा पराभव झाला.

फायनल सामन्यात भारताचा पराभव

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. भारतीय संघाने सर्वबाद 240 धावा केल्या. भारतीय संघाकडून केएल राहुलने 107 बॉलमध्ये 66 धावा केल्या. तर विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकावले आणि भारताच्या विजयाची घौडदोड रोखली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.