AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA Final : भारत दक्षिण अफ्रिका अंतिम फेरीचा पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? जाणून घ्या

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका आमनेसामने येणार आहेत. क्रिकेटविश्वाला नवा विजेता मिळणार हे आता नक्की झालं आहे. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण असेल? ते जाणून घ्या

IND vs SA Final : भारत दक्षिण अफ्रिका अंतिम फेरीचा पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? जाणून घ्या
IND vs SA Final : भारत दक्षिण अफ्रिका अंतिम फेरीचा पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? जाणून घ्याImage Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Oct 31, 2025 | 3:40 PM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच नवा विजेता मिळणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं हे 13वं पर्व असून आतापर्यंत भारत आणि दक्षिण अफ्रिका दोन्ही संघांची झोळी रितीच राहिली आहे. 1973 साली वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली होती. पहिल्या पर्वात इंग्लंडने बाजी मारली होती. ऑस्ट्रेलियाने 7 वेळा इंग्लंडने 4 वेळा, तर न्यूझीलंडने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात भारत दक्षिण अफ्रिका स्पर्धेतून नवा विजेता मिळणार हे नक्की झालं आहे. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना 2 नोव्हेंबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत होणार आहे.

भारत दक्षिण अफ्रिका अंतिम सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर विजेता कसा घोषित करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. उपांत्य फेरीत गुणतालिकेच्या आधारावर अंतिम फेरीचं तिकीट दिलं जाणार हे निश्चित होतं. पण आता अंतिम फेरीत काय? तर अंतिम फेरीत पाऊस पडला तर एक दिवस राखीव ठेवला आहे. खरं तर हा सामना 2 नोव्हेंबरला पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल. डकवर्थ लुईस नियमानुसार टार्गेट दिलं जाईल. पण हा सामना त्या दिवशी झालाच नाही तर मग एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. 3 नोव्हेंबरला हा सामना होईल.

राखीव दिवशीही सामना झाला नाही तर विजेता कोण?

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना झाला नाही तर गुणतालिकेच्या आधारावर विजेता ठरवणार का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण अंतिम फेरीचा सामना राखीव दिवशीही पावसामुळे झाला नाही तर विजेता विभागून दिला जाईल. म्हणजेच भारत आणि दक्षिण अफ्रिका यांना संयुक्त विजेता घोषित केलं जाईल.

भारत दक्षिण अफ्रिका साखळी फेरीतील सामन्याचा निकाल

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात साखळी फेरीत लढत झाली होती. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारतावर 3 गडी राखून विजय मिळवला होता. भारताने 49.5 षटकांचा सामना करून सर्व गडी गमवून 251 धावा केल्या होत्या. तर विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण अफ्रिकेने हे आव्हान 48.5 षटकात 7 गडी गमवून पूर्ण केलं.

Follow Us
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!