AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA Final : भारत दक्षिण अफ्रिका अंतिम फेरीचा पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? जाणून घ्या

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका आमनेसामने येणार आहेत. क्रिकेटविश्वाला नवा विजेता मिळणार हे आता नक्की झालं आहे. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण असेल? ते जाणून घ्या

IND vs SA Final : भारत दक्षिण अफ्रिका अंतिम फेरीचा पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? जाणून घ्या
IND vs SA Final : भारत दक्षिण अफ्रिका अंतिम फेरीचा पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? जाणून घ्याImage Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Oct 31, 2025 | 3:40 PM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच नवा विजेता मिळणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं हे 13वं पर्व असून आतापर्यंत भारत आणि दक्षिण अफ्रिका दोन्ही संघांची झोळी रितीच राहिली आहे. 1973 साली वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली होती. पहिल्या पर्वात इंग्लंडने बाजी मारली होती. ऑस्ट्रेलियाने 7 वेळा इंग्लंडने 4 वेळा, तर न्यूझीलंडने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात भारत दक्षिण अफ्रिका स्पर्धेतून नवा विजेता मिळणार हे नक्की झालं आहे. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना 2 नोव्हेंबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत होणार आहे.

भारत दक्षिण अफ्रिका अंतिम सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर विजेता कसा घोषित करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. उपांत्य फेरीत गुणतालिकेच्या आधारावर अंतिम फेरीचं तिकीट दिलं जाणार हे निश्चित होतं. पण आता अंतिम फेरीत काय? तर अंतिम फेरीत पाऊस पडला तर एक दिवस राखीव ठेवला आहे. खरं तर हा सामना 2 नोव्हेंबरला पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल. डकवर्थ लुईस नियमानुसार टार्गेट दिलं जाईल. पण हा सामना त्या दिवशी झालाच नाही तर मग एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. 3 नोव्हेंबरला हा सामना होईल.

राखीव दिवशीही सामना झाला नाही तर विजेता कोण?

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना झाला नाही तर गुणतालिकेच्या आधारावर विजेता ठरवणार का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण अंतिम फेरीचा सामना राखीव दिवशीही पावसामुळे झाला नाही तर विजेता विभागून दिला जाईल. म्हणजेच भारत आणि दक्षिण अफ्रिका यांना संयुक्त विजेता घोषित केलं जाईल.

भारत दक्षिण अफ्रिका साखळी फेरीतील सामन्याचा निकाल

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात साखळी फेरीत लढत झाली होती. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारतावर 3 गडी राखून विजय मिळवला होता. भारताने 49.5 षटकांचा सामना करून सर्व गडी गमवून 251 धावा केल्या होत्या. तर विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण अफ्रिकेने हे आव्हान 48.5 षटकात 7 गडी गमवून पूर्ण केलं.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं