AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचं कर्णधारपद का सोडलं? विराट कोहलीने चार वर्षानंतर कुठे खरं काय ते सांगितलं

विराट कोहलीने भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं नेतृत्व केलं आहे. मात्र त्यानंतर त्याने कर्णधारपदाला सोडचिठ्ठी दिली आणि फक्त फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत केलं. पण त्याने कर्णधारपद का सोडलं याबाबत खरं कारण कोणालाच माहिती नव्हतं. अखेर चार वर्षानंतर विराट कोहलीने याबाबतचा खुलासा केला आहे. तसेच कर्णधारपद का सोडलं ते सांगितलं आहे.

टीम इंडियाचं कर्णधारपद का सोडलं? विराट कोहलीने चार वर्षानंतर कुठे खरं काय ते सांगितलं
विराट कोहलीImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 06, 2025 | 5:16 PM
Share

विराट कोहलीने टी20 वर्ल्डकप 2021 नंतर कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदालाही रामराम ठोकला. त्यानंतर एका वर्षानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर कसोटी कर्णधारपदही सोडलं. त्यानंतर कर्णधारपदाची माळ रोहित शर्माच्या गळ्यात पडली. पण विराट कोहलीने कर्णधारपद का सोडलं? याची चर्चा तेव्हा रंगली होती. पण खरं कारण कोणालाच माहिती नव्हतं. अखेर चार वर्षानंतर विराट कोहलीने खुलासा केला आहे. विराट कोहलीने सांगितलं की, ‘एक वेळ अशी आली की जेव्हा माझ्या कारकि‍र्दीत बरंच काही घडलं आणि माझ्यासाठी ते खूपच कठीण झालं. मी 7-8 वर्षे भारताचं नेतृत्व करत होते. मी 9 वर्षे आरसीबीचं नेतृत्व केलं. मी जे काही सामने खेळलो, त्यात माझ्याकडून फलंदाज म्हणून खूपच अपेक्षा होत्या.’

‘मला कळतंच नव्हतं की मी लक्ष केंद्रीत करण्यास संघर्ष करत आहे. कर्णधारपद भूषवताना तसं होत नव्हतं. पण फलंदाजी करताना तसं होत होतं. मी प्रत्येक वेळी त्याचाच विचार करायचो. ते माझ्यासाठी खूपच कठीण झालं होतं. अखेर या सर्व गोष्टींचा माझ्यावर खूपच दबाव वाढला होता.’ विराट कोहलीने 2022 मध्ये क्रिकेटमधून एक महिन्यांचा ब्रेक घेतला होता. तेव्हा त्याने बॅटला स्पर्शही केला नव्हता. तसेच सार्वजनिक जीवनात आनंदी राहण्यासाठी संघर्ष करत होता.

विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचं कारण सांगत म्हणाली की, ‘मी कर्णधारपद सोडलं कारण मला वाटले की जर मला खेळात राहायचे असेल तर माझ्यासाठी आनंदी राहणं महत्त्वाचं आहे.’ विराट कोहली पुढे म्हणाली की, ‘मला माझ्या आयुष्यात अशा ठिकाणी असण्याची गरज होती जिथे मी राहू शकेन, तसेच माझे क्रिकेट खेळू शकेन. कोणत्याही टीकेशिवाय. या पर्वात तु्म्ही काय करणार आहात आणि पुढे काय होणार आह हे न पाहता.’ विराट कोहली आयपीएल 2025 स्पर्धेत रजत पाटिदारच्या नेतृत्वात आरसीबी संघाकडून खेळत आहे. या पर्वात विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने 500 हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक 7 अर्धशतकं ठोकली आहेत.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा