AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 1st ODI: ‘या’ तीन चुकांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव

खरंतर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट (Virat kohli) मैदानावर असताना भारत सहज सामना जिंकेल असे वाटत होते. पण दुर्देवाने असं होऊ शकलं नाही. भारताच्या पराभवाची काय कारणं आहेत, ते जाणून घेऊया.

IND vs SA 1st ODI: 'या' तीन चुकांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 10:09 PM
Share

पार्ल: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये (India vs South Africa) भारताचा पराभव झाला आहे. मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. खरंतर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट (Virat kohli) मैदानावर असताना भारत सहज सामना जिंकेल असे वाटत होते. पण दुर्देवाने असं होऊ शकलं नाही. भारताच्या पराभवाची काय कारणं आहेत, ते जाणून घेऊया.

1 भारताची गोलंदाजी अजिबात चालली नाही. जसप्रीत बुमराह, शादुर्ल ठाकूर, भुवनेश्वर, चहल आणि अश्विन पूर्णपणे निष्प्रभ ठरले. बावुमा-डुसे जोडीने चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली. तिथेच भारताचा विजयाचा मार्ग सोपा नसेल हे स्पष्ट झाले. ज्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. तिथे अश्विन आणि चहल फारसे चालले नाहीत.

2 कसोटी प्रमाणे इथे सुद्धा फलंदाजीच भारचाच्या पराभवाला कारणीभूत आहे. विराट-धवनमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी झाली. खरंतर हे दोघे खेळपट्टीवर असे पर्यंत भारत सहज जिंकेल असे चित्र होते. पण हे दोघे बाद होताच डाव गडगडला. या दोघांव्यतिरिक्त अन्य फलंदाज फ्लॉप ठरले.

3 केएल राहुलकडे भारताचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जाते. पण त्याची रणनितीच समजत नाही. वेंकटेश अय्यरला ऑलराऊंडर म्हणून संघात घेतलं. पण त्याला एक ओव्हरही दिली नाही. प्रमुख गोलंदाज बावुमा-डुसे जोडीपुढे निष्प्रभ ठरत असताना वेंकटेश अय्यरला संधी देऊन पाहायला हरकत नव्हती.

Why india lost against south Africa in first odi these are three reasons

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.