AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs West Indies 3rd T20 ची वेळ बदलली, जाणून घ्या कधी सुरु होणार सामना?

India vs West Indies 3rd T20: भारत आणि वेस्ट इंडिज मधील तिसऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे.

India vs West Indies 3rd T20 ची वेळ बदलली, जाणून घ्या कधी सुरु होणार सामना?
ind vs wi Image Credit source: twitter
| Updated on: Aug 02, 2022 | 2:57 PM
Share

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज मधील तिसऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. या सामन्याचा टॉस आता 8 ऐवजी 9 वाजता होणार आहे. म्हणजे मॅच मधील पहिला चेंडू रात्री 9.30 वाजता टाकला जाईल. भारतीय वेळेनुसार, रात्री 9.30 वाजता सामना सुरु होईल. तिसऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या वेळेत झालेल्या बदलाबद्दल BCCI कडून माहिती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने टि्वट करुन सामन्याच्या वेळेत झालेल्या बदलाबद्दल माहिती दिली. खेळाडूंना आराम मिळावा, या हेतुने तिसऱ्या टी 20 सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये दुसरा टी 20 सामना उशिराने सुरु झाला होता. भारतीय वेळेनुसार, रात्री उशिरा हा सामना संपला. खेळाडूंना फार थकवा जाणवू नये, यासाठी तिसऱ्या टी 20 सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

मॅचच्या वेळेबद्दल बीसीसीआयकडून टि्वट

BCCI ने टि्वट करुन तिसऱ्या टी 20 सामन्याच्या वेळेबद्दल माहिती दिली आहे. तिसऱ्या टी 20 सामन्याचा टॉस भारतीय वेळेनुसार, रात्री 9 वाजता होईल. मॅचची सुरुवात 9.30 वाजता होणार आहे.

वेळेतील बदलावर दोन्ही टीम्स सहमत

संघाचं सामान वेळेवर न पोहोचल्यामुळे दुसरा टी 20 सामनाही उशिराने सुरु झाला होता. दोन्ही संघ तिसरा टी 20 सामना उशिराने सुरु करण्यावर सहमत आहेत. खेळाडूंना आराम मिळावा, हा त्यामागे हेतू आहे. हा निर्णय घेण्याआधी फ्लोरिडा मध्ये होणाऱ्या सलग दोन सामन्यांबद्दलही विचार करण्यात आला आहे.

फ्लोरिडा मध्ये होणार शेवटचे दोन सामने

शेवटचे दोन सामने फ्लोरिडा मध्ये होणार, हे क्रिकेट वेस्ट इंडिजच्या विधानावरुन स्पष्ट झालय. अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यात अडचणी येत असल्याने, हे सामने दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतात अशी चर्चा होती. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. भारताने पहिला टी 20 सामना 68 धावांनी जिंकला.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष