AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs West Indies 3rd T20 ची वेळ बदलली, जाणून घ्या कधी सुरु होणार सामना?

India vs West Indies 3rd T20: भारत आणि वेस्ट इंडिज मधील तिसऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे.

India vs West Indies 3rd T20 ची वेळ बदलली, जाणून घ्या कधी सुरु होणार सामना?
ind vs wi Image Credit source: twitter
| Updated on: Aug 02, 2022 | 2:57 PM
Share

मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज मधील तिसऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. या सामन्याचा टॉस आता 8 ऐवजी 9 वाजता होणार आहे. म्हणजे मॅच मधील पहिला चेंडू रात्री 9.30 वाजता टाकला जाईल. भारतीय वेळेनुसार, रात्री 9.30 वाजता सामना सुरु होईल. तिसऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या वेळेत झालेल्या बदलाबद्दल BCCI कडून माहिती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने टि्वट करुन सामन्याच्या वेळेत झालेल्या बदलाबद्दल माहिती दिली. खेळाडूंना आराम मिळावा, या हेतुने तिसऱ्या टी 20 सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये दुसरा टी 20 सामना उशिराने सुरु झाला होता. भारतीय वेळेनुसार, रात्री उशिरा हा सामना संपला. खेळाडूंना फार थकवा जाणवू नये, यासाठी तिसऱ्या टी 20 सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

मॅचच्या वेळेबद्दल बीसीसीआयकडून टि्वट

BCCI ने टि्वट करुन तिसऱ्या टी 20 सामन्याच्या वेळेबद्दल माहिती दिली आहे. तिसऱ्या टी 20 सामन्याचा टॉस भारतीय वेळेनुसार, रात्री 9 वाजता होईल. मॅचची सुरुवात 9.30 वाजता होणार आहे.

वेळेतील बदलावर दोन्ही टीम्स सहमत

संघाचं सामान वेळेवर न पोहोचल्यामुळे दुसरा टी 20 सामनाही उशिराने सुरु झाला होता. दोन्ही संघ तिसरा टी 20 सामना उशिराने सुरु करण्यावर सहमत आहेत. खेळाडूंना आराम मिळावा, हा त्यामागे हेतू आहे. हा निर्णय घेण्याआधी फ्लोरिडा मध्ये होणाऱ्या सलग दोन सामन्यांबद्दलही विचार करण्यात आला आहे.

फ्लोरिडा मध्ये होणार शेवटचे दोन सामने

शेवटचे दोन सामने फ्लोरिडा मध्ये होणार, हे क्रिकेट वेस्ट इंडिजच्या विधानावरुन स्पष्ट झालय. अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यात अडचणी येत असल्याने, हे सामने दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतात अशी चर्चा होती. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. भारताने पहिला टी 20 सामना 68 धावांनी जिंकला.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.